यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात "पर्यावरण 2021" भित्ती पत्रकाचे अनावरण*
तुळजापूर:- येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात 20 मार्च जागतिक चिमणी दिवस,21 मार्च जागतिक वन्यदिन,22 मार्च जागतिक जल दिन या तिन्ही दिनाचे औचित्य साधून "पर्यावरण-2021" या भित्ती पत्रकाचे अनावरण बालाघाट शिक्षण संस्थेचे सचिव उल्हास (दादा) बोरगावकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले.या निमित्त महाविद्यालयात पर्यावरण , मत्स्यशास्त्र , नॅक विभागाच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला या मध्ये चिमणी दिन ,वन्यदिन, जलदिन याचे लेख आणि चित्राचे भित्तीपत्रक नॅक समन्वय डॉ. प्रवीण भाले, मत्स्यशास्त्र विभागाचे प्रा.डॉ. शिवाजी जेटीथोर आणि रसायनशास्त्र विभागाच्या प्रा.स्नेहा ठाकूर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कु. ऋतुजा घोरपडे, कु.स्नेहा जाधव, अनिकेत कदम,कु. दिव्या देशमुख,कु. प्रीती जाधव यांनी बनवले होते.प्रारंभी उल्हास दादा बोरगावकर साहेब यांचे स्वागत प्राचार्य डॉ. मोहन बाबरे यांनी केले.तसेच प्राचार्य डॉ.मोहन बाबरे ,उपप्राचार्य डॉ. नरसिंग जाधव, सिनेट सदस्य प्रो. डॉ. गोविंद काळे यांचे स्वागत प्रो. डॉ.अनिल शित्रे, प्रा. डॉ.प्रवीण भाले यांनी केले.प्रास्ताविक प्रा. स्नेहा ठाकूर मॅडम यांनी केले सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. शिवाजी जेटीथोर यांनी केले तर आभार प्रा. डॉ. प्रवीण भाले यांनी मानले या कार्यक्रमास प्रो.डॉ. शेषेराव जावळे,प्रो. डॉ.सुरेंद्र मोरे,प्रा. डॉ. शशिकला भालकरे, प्रा. अनिल पाटील, प्रा. डॉ. अंबादास बिराजदार,प्रा. डॉ. पांडुरंग शिवशरण तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राजू बनसोडे, माऊली माने,बासूतकर,समीर शेख,ताकमोघे यांनी परिश्रम घेतले.
प्रतिनिधी रूपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा