कृषी कायद्याच्या विरोधात राष्ट्रवादी किसान सभेचा भारत बंदला पाठिंबा*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
केंद्रातील भाजपा सरकारने केलेले काळे कृषी कायदे रद्द करावेत , या मागणीसाठी 26 मार्च रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदमध्ये राष्ट्रवादी किसन सभा सहभागी होणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिली.
यासंदर्भात तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून यामध्ये नमूद केले आहे की, आता पर्यंत या आंदोलनात तिनशे बळी जावुन देखील सरकार गेंड्याची कातडी पांघरुण बसले असुन सार्वजनिक संपत्ती व व कंपन्यांच्या विक्री चा धडाका लावला आहे.गॅस सिलेंडर, पेट्रोल, डिझेल च्या किंमतीत भरमसाठ वाढ करुन गोरगरीबांचे कंबरठे मोडण्याचे काम केले आहे ,त्या मुळे संयुक्त किसान मोर्चा च्या वतीने 26/032021 शुक्रवार रोजी भारत बंदची हाक दिली असून सदर बंदला राष्ट्रवादी किसान सभेने सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. सदर बंद मध्ये सर्व शेतकरी,व्यापारी,व कामगार यांनी उत्स्फूर्त पणे सहभागी व्हावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस किसान सभा कार्यकारी तालुका अध्यक्ष सचिन नलवडे यांनी केले आहे. यावेळी
संतोष वारे तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा,
शिवाजी जाधव सामाजिक न्याय तालुका अध्यक्ष,भोजराज सुरवसे
विधानसभा अध्यक्ष करमाळा राष्ट्रवादी काँग्रेस,दत्तात्रय अडसूळ
ओबीसी तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा,नितीन झिंजाडे
राष्ट्रवादी पदवीधर संघ प्रदेश कार्यकारणी सदस्य,महेश मोरे
जिल्हा सरचिटणीस सामाजिक न्याय, विठ्ठल इवरे
ग्रामपंचायत सदस्य हिवरवाडी,
हनुमंत मांढरे
कार्याध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा,महेश काळे
माजी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस युवक आदी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा