Breaking

शुक्रवार, २ एप्रिल, २०२१

केंद्र सरकारने इंधन दर वाढ केल्याने शेतीचे गणित कोलमडले*

केंद्र सरकारने इंधन दर वाढ केल्याने
 शेतीचे गणित कोलमडले*
वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

        सततच्या इंधन दरवाढीत डिझेलच्या व ऑईलच्या दरवाढीमुळे शेतीसाठी उपयुक्त असलेला ट्रॅक्टर तसेच विविध उपकरणावरील मशागतीच्या खर्चात वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचे शेती मशागतीचे गणित पूर्णपणे कोलमडले आहे. मशागतीच्या खर्चात वाढ झाल्यामुळे आर्थिक ताळमेळ बसविण्यासाठी शेतकऱ्याला कसरत करावी लागत आहे.
        सर्व सामान्य नागरिकांबरोबर आता इंधन दरवाढीचा फटका शेतकऱ्यालाही बसत आहे. शेतीसाठी आता ट्रॅक्टरचा अधिकच वापर होत आहे. ट्रॅक्टरसह शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांना इंधनाची गरज असते. ट्रॅक्टरमुळे वेळेची बचत होत असली तरी त्याला लागणाऱ्या डिझेल, ऑईलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे मशागतीच्या दरातही वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्याला यंदा ट्रॅक्टरची मशागत महाग वाटू लागली आहे.
        यांत्रिकीकरणावर शेती आधारित शेती सुरू झाल्यानंतर अल्पभू-धारक शेतकऱ्यांकडे पूर्वी बैलजोडी दिमाख्यात उभी असायची, त्याच दरात आता ट्रॅक्टर उभा असलेला दिसून येत आहे. पिक पेरणी करण्यापासून ते सर्व शेतीच्या मशागतीची कामे अवघ्या काही तासात होत असल्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरच्या साहाय्याने शेती करत आहे. शेतकऱ्याचा वेळ व परिश्रम यामुळे वाचत असल्यामुळे पारपांरिक पध्दतीने बैलजोडीच्या साहाय्याने शेती करणारा शेतकरी आता ट्रॅक्टरला आपली पसंती देत आहे.
           एकेकडे परिश्रम कमी व वेळेची बचत होत असली तरी इंधन दरवाढीमुळे शेतीसाठी होणारा खर्च वाढतच आहे. बहुतांश शेतकरी भाडेतत्वावर शेतीची मशागत करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र आता नांगरनी, मळणी आदिसाठी जादा पैसे मोजावे लागत असल्यामुळे वाढलेल्या खर्चाचा ताळमेळ बसविणे अवघड बनले आहे.यांत्रिककरणाचा शेतीमध्ये जसा शिरकाव झाला आहे तसे पारपांरिक पध्दतीने शेतीच्या मशागतीसाठी लागणाऱ्या बैलजोडी जवळपास हद्दपार होत चालल्या आहेत. शासनाने केलेल्या इंधन दरवाढीमुळे ९० टक्के शेतकऱ्यांना उत्पन्न कमी व उत्पादन खर्च अधिक या अडचणी निर्माण होत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा