Breaking

गुरुवार, २४ जून, २०२१

विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस अतुल खूपसे-पाटील यांच्या भेटीने सोलापूर जिल्ह्यात चर्चेला उधाण*


*विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस अतुल खूपसे-पाटील यांच्या भेटीने सोलापूर जिल्ह्यात चर्चेला उधाण*
टेंभुर्णी प्रतिनिधी/गणेश चौगुले यास कडून

शेतकर्‍यांच्या कर्जासंबंधी विधानसभेत प्रश्न उपस्थित करणार...देवेंद्र फडणवीस                        करमाळा माढा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या नावावर पंजाब नॅशनल बँकेकडून आमदार संजय शिंदे यांच्या म्हैसगाव येथील विठ्ठल कार्पोरेशन कारखान्याने  परस्पर घेतलेल्या 22 कोटी 11 लाख रुपयांच्या कर्जा संबंधी विधानसभेत प्रश्न उपस्थित करू असे  विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष अतुल खूपसे पाटील यांना  आश्वासन दिले .अतुल खूपसे पाटील यांनी मुंबईत विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांना या प्रश्नासंबंधी निवेदन दिले.यावेळी खुपसे पाटील यांच्याशी सविस्तर चर्चा करून फडणवीस यांनी प्रश्नासंबंधी माहिती घेतली.आणी शेतकर्‍यांना न्याय मीळवून देण्याचे आश्वासन देऊन याबाबत आम्ही लवकरच चौकशी लावणार असल्याचे आश्वासन खूपसे यांना दिल्याने सोलापूर जिल्ह्यात चर्चेला उधाण आले आहे.                                                                
अतुल भाऊ खूपसे प्रहार च्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी नेहमी महाराष्ट्रात लढत राहिले मात्र प्रहार सोडण्यास ते गप्प राहतील अशी चर्चा सर्वत्र असताना मात्र त्यांनी आपले सामाजिक काम पुढे चालू ठेवून शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्रात आंदोलन असो उजनीच्या पाण्यासाठी टायर पेटवून आंदोलन असो की कारखाने उचललेले शेतकऱ्यांचे पैशासाठी अर्धनग्न आंदोलन असो अशा आंदोलनामुळे नेहमीच ते सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात ते चर्चेत येऊ लागल्याने अनेक शेतकरी त्यांच्या पाठीमागे उभे राहत असल्याचे दिसून येऊ लागल्याने अनेक पुढाऱ्याचे अतुल भाऊ खूपसे च्या कामामुळे धाबे दणाणले आहेत अतुल भाऊ पुढे काय करतात हा नेहमी प्रश्न अनेक पुढाऱ्यांना  धजवत असतो 
अतुल खुपसे- पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुण्यातील पंजाब नॅशनल बॅंकेच्या मुख्यालयासमोर शेतकर्‍यांचे आंदोलन झाले.त्यामुळे शेतकर्‍यांच्या नावावर परस्पर कर्ज काढण्याचे प्रकरण राज्यभर गाजले.या कर्जप्रकरणात पंजाब नॅशनल बॅंकेचे अधिकारी व विठ्ठल कार्पोरेशनचे चेअरमन  आमदार संजय शींदे यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी.शेतकर्‍यांच्या नावावर कर्ज असल्यामुळे ईतर बॅंका त्यांना कर्ज देत नाहीत.त्यामुळे शेतकरी हतबल झाले असून भविष्यात असे प्रकार घडू नयेत म्हणूम पावले उचलावीत असेही अतुल खुपसे पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे.माजी जलसंपदामंत्री गीरीश महाजन यांचीही भेट घेऊन खुपसे पाटील यांनी शेतकर्‍यांच्या प्रश्नांसंदर्भात चर्चा केली.
****************Advt*******†***********

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा