*राज्यभरात विविध सामाजिक उपक्रमांमुळे टायगर ग्रुप चर्चेत*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवलेल्या टायगर ग्रुपचे संस्थापक डॉ तानाजी जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात अनेक उपक्रम सुरू असून यानिमित्ताने राज्यात टायगर ग्रुपच्या समाजोपयोगी उपक्रमांची चर्चा होताना दिसत आहे.
याबाबत अधिक माहिती देताना डॉ तानाजी जाधव म्हणाले की,जळगाव जिल्ह्यातील शिरसोली येथे शिवराज्याभिषेक दिनानिमित्त टायगर ग्रुपने वृक्षारोपण आयोजित केले.पाली ता बीड येथील आनंदग्राम या एचआयव्ही बधितांसाठी काम करणाऱ्या संस्थेस टायगर ग्रुप मराठवाडा कडून अन्नधान्य, फळे,सॅनिटायझर,मास्कचे वाटप करण्यात आले.तसेच पारोळा ,धरणगाव जी जळगाव येथेही टायगर ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी शिवराज्याभिषेक दिनाचे निमित्त साधत वृक्षारोपण केले.पिंपरखेड ता पाचोरा येथे टायगर ग्रुपच्या वतीने कोरोनामुक्त रुग्णांना 15 दिवस पुरेल एवढ्या अन्नधान्य, किराणा सामानाचे वाटप करण्यात आले.देवगाव ता चोपडा येथे शिवराज्याभिषेक दिन व पर्यावरण दिनाचे निमीत्त साधत वृक्षारोपण करण्यात आले.
महाराष्ट्राच्या बाहेर इतर राज्यांमध्ये सुद्धा टायगर ग्रुपकडून रक्तदान शिबीर, मास्क, सॅनिटायझर, अन्नधान्य वाटप आदी उपक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती डॉ तानाजी जाधव यांनी दिली. टायगर ग्रुपच्या या सामाजिक कार्याची दखल राज्यातील विविध प्रसार माध्यमांनी घेतली असून सामाजिक क्षेत्रात या उपक्रमाची जोरदार चर्चा होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा