*7 वर्षाच्या मुलाचा दिला बळी मूल होण्यासाठी दिला नरबळी ? कागल मधील दुर्दैवी घटना*
उमेश विभुते
विशेष जिल्हा प्रतिनिधी
कोल्हापूर
7058567272
*कोल्हापूर* : कागल मध्ये स्वतःला मूल होत नाही म्हणून मित्राच्या मुलाचे अपहरण करून त्याचा बळी देण्यात आल्याची संतापजनक घटना सोनाळी ( ता. कागल ) येथे शुक्रुवारी सकाळी उघडकीस आली आहे वरद रवींद्र पाटील असे बळी देण्यात आलेल्या सात वर्षे बालकाचे नाव आहे तर संशयित मारुती वैद्य वय वर्षे 45 असे अपहरण क्रूर कर्म करणाऱ्या व्यक्तीचे नाव असल्याचे समजते
या घटनेची गोपनीय सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की वरद हा आपल्या जवळ सावर्डे बुद्रुक येथे आजोबा दत्तात्रय शंकर म्हातुगडे यांच्या घरी वास्तुशांती कार्यक्रमासाठी आई-वडिलांच्या सोबत गेला होता मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास तो बेपत्ता झाला रात्रभर व दुसऱ्या दिवशी दिवसभर सर्वत्र शोध घेऊनही सापडला नाही भर वस्तीत ओंवरद कसा गायब झाला यावर तर्कवितर्क सुरू होते या गल्लीत नेहमी नागरिकांची वर्दळ असते आशा ठिकाणं होऊन गायब झाल्याने हे कृत्य कुणीतरी माहितगार व्यक्तीचे असल्याची शक्यता सर्वसामान्य नागरिकांतून होत होती व्यक्त
वरद सावर्डे बुद्रुक ता करवीर दोन दिवसापासून झाले होते याबाबतची तक्रार त्यांचे वडील रवींद्र गणपती पाटील यांनी मुरगूड पोलिस ठाण्यात दाखल केली होती परंतु पोलिसांना तपास करण्यात अपयश आले.
कारण त्याचा मृतदेह समडोळी डोंगरात सापडून आल्याने एकच खळबळ उडाली पंचक्रोशीतील महिला ग्रामस्थांनी प्रचंड संतापाची लाट पसरली असून या घटनेबाबत त्यांनी पोलिसांना घेराव घालून जाब विचारण्यासाठी प्रयत्न केला असता त्यांना पोलिसाकडून संशयित मारुती वैद्य या क्रूर कर्म व्यक्तीने अपहरण करून बळी देण्याचे मान्य केले असल्याचे समजते मात्र वरील घटनेबाबत API बडवे तपास करत आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा