Breaking

मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१

सीना-माढा उपसासिंचन खंड न पडू देता कार्यान्वित असलेली राज्यातील एकमेव योजना - जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे माढा ते उपळाई बुद्रुक रोडजवळील गालिशबाबा येथील तलावातील पाण्याचे पूजन


सीना-माढा उपसासिंचन खंड न पडू देता कार्यान्वित असलेली राज्यातील एकमेव योजना - जि.प.सदस्य रणजितसिंह शिंदे


माढा ते उपळाई बुद्रुक रोडजवळील गालिशबाबा येथील तलावातील पाण्याचे पूजन



माढा / प्रतिनिधी- राज्यातील अनेक उपसासिंचन योजना योग्य नियोजनाचा अभाव आणि थकित वीज बीलापोटी बंद आहेत परंतु आमदार बबनदादा शिंदे व विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून सीना-माढा उपसासिंचन खंड न पडू देता कार्यान्वित असलेली राज्यातील एकमेव योजना असून या योजनेतील पाण्यामुळे तालुक्यातील हजारों हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांनी केले आहे.

ते माढा ते उपळाई बुद्रुक रोडजवळील गालिशबाबा येथील उपसासिंचन योजनेतून प्रथमच भरलेल्या तलावातील पाणी पूजनाप्रसंगी मंगळवारी बोलत होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श शिक्षक राजेंद्र गुंड यांनी केले.

पुढे बोलताना रणजितसिंह शिंदे म्हणाले की,माढा शहर व उपळाई परिसरातील अनेक वर्षांपासूनची मागणी या निमित्ताने पूर्ण झाली आहे. उजनी धरणातून पावसाळ्यात वाहून जाणारे पाणी उपयोगात आणण्यासाठी ही योजना आमदार बबनदादा शिंदे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा करून कार्यान्वित केली आहे.या महत्त्वाकांक्षी योजनेचे वीज बील कधीच थकित ठेवले नाही. शेतकऱ्यांकडून वसुली होईपर्यंत विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून वीज बील भरले जाते आणि शेतकऱ्यांना पाणी मिळवून दिले जाते.भविष्यात या भागातील शक्य असलेले सर्व पाझर तलाव,गावतळी व बंधारे भरण्यासाठी प्रयत्न केला सुरू आहे. शेतकऱ्यांनी प्रत्येक ठिकाणी सोसायटीची स्थापना करून वेळेवर वीज बील व पाणी पट्टी भरल्यास ही योजना कायमस्वरूपी फलदायी ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

याप्रसंगी जिल्हा दूध संघाचे संचालक शंभूराजे मोरे, माजी जि.प.सदस्य झुंजार भांगे,पंचायत समिती सदस्य दगडू शिंदे,सरपंच संदीप पाटील, ॲड.शैलेश मेहता,ॲड,सुरेश पाटील,नगरसेवक सुभाष जाधव, नगरसेवक राजू गोटे,शहाजी चवरे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दत्तात्रय अंबुरे,चेअरमन अनिलकुमार अनभुले,अभियंता विलास देशमुख, प्रशांत चव्हाण,धनाजी बेडगे, उपसरपंच अभिषेक देशमुख,संतोष जाधव,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अमोल चवरे,तालुका उपाध्यक्ष रामचंद्र भांगे,शाखाधिकारी आण्णासाहेब पाटील,प्रदिप चौगुले, श्रीकांत कोरे,बाळासाहेब कदम, अशोक पाटील,हनुमंत मोहिते, मुख्याध्यापक विलास बोराडे,अनिल कदम,शिवाजी गोरे,राऊत सर,विजय माने,राजेंद्र भांगे,मनोहर गायकवाड, शाहू वाकडे,दिगंबर इंगळे, आण्णासाहेब देशमुख,संदीप गोरे, तानाजी राऊत,किरण कदम,लक्ष्मण कांबळे,बब्रुवान केदार,विष्णू हराळे, महादेव टोणपे,अरुण माने,हेमंत कांबळे,दत्तात्रय कदम,नितीन गोरे, नागनाथ करपे,शेखर कचरे,सोमनाथ हराळे,तानाजी कचरे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकरी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करून आभार राजेंद्र गुंड यांनी मानले.

फोटो ओळी - माढा ते उपळाई बुद्रुक रोडजवळील गालिशबाबा येथील तलावातील पाणी पूजन करताना जि. प.सदस्य रणजितसिंह शिंदे,शंभूराजे मोरे,झुंजार भांगे,संदीप पाटील व इतर मान्यवर.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा