Breaking

शुक्रवार, १३ ऑगस्ट, २०२१

अवैद्य व्यवसायांकडे पोलिसांचे लक्ष नाही.....श्रीगोंदा आणि बेलवंडी पोलिस स्टेशन च्या हद्दित लाखोंचा धंदा....


अवैद्य व्यवसायांकडे पोलिसांचे  लक्ष नाही.....

श्रीगोंदा आणि बेलवंडी पोलिस स्टेशन च्या हद्दित लाखोंचा धंदा....

श्रीगोंदा:नितीन रोही

 तालुक्यात अवैद्य व्यवसाय
 हे सध्याच्या काळात जोमाने चालू आहेत. त्यावर श्रीगोंदा व बेलवंडी पोलिसांचे लक्ष नाही असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
 या गैर धंद्याबाबत माहिती पोलिसांना असून सुध्दा ते जाणीव पुर्वक दुर्लक्षित करतात.  अवैद्य धंद्याविषयी चर्चा होत ते गोरख धंदे उजेडात येऊ लागले आहेत. त्याच बरोबर या धंद्यावर लक्ष अरणारे किंवा नैसर्गिक दुर्लक्ष करणारे श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस स्टेशनच्या अधिकारी  वर्गावर मात्र, अनेकांनी लक्ष वेधले आहे.

सामान्य मध्यमवर्गीय माणुस असल्या प्रक्रियेपासून कोसो दूर आहे. परंतु, स्वतःच्या घरातील काही अल्पवयीन मुलं जेंव्हा या अवैध धंद्यांच्या फंद्यात सापडून व्यसनाधीन होऊन बरबाद होतात. तेंव्हा चाललेले वास्तव यातून उजेडात येते. गुटखा, मावा, गांजा, सिगारेट, शेकडो टपऱ्यांच्या माध्यमांतून विक्री होत, हजारो सामान्य मुलांचे शारीरिक नुकसान होत आहे. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असून, टपरीवाल्यांकडून सुध्दा काही पोलीस कर्मचारि हप्ता घेत आहेत अशी सुध्दा चर्चा नागरिकांची होताना दिसते.


वरील विषयातून नशेचे पदार्थ ज्यात गांजा, मेडिकल मधील औषधी गोळ्या, इंजेक्शन्स व रोजच्या वापरात येणारे काही पदार्थांचे अतिसेवन यातून व्यसन करणारी अल्पवयीन तरुण मुले वाया जाताना दिसत आहेत. अनधिकृत पद्धतीने चाललेल्या या प्रकारा विरोधातही पोलीस प्रशासन अनभिज्ञ असल्याचे दिसते. परिणामी हा प्रकार तालुक्यात जोर धरतांना दिसतोय.

याच बरोबर अवैध वाळू तस्करी, दारू विक्री, केमिकल युक्त ताडी विक्री, गांजा विक्री, देहविक्री, गोमांस विक्री, मटका, जुगार, बिंगो, गोवा, गुटका, खर्रा, भेसळयुक्त दूध, भेसळ युक्त जारचे पाणी, भेसळयुक्त हॉटेल मधील खाद्य पदार्थ अशा वेगवेगळ्या गैर उद्योगांतून सामान्यांच्या जीवनाशी खेळण्याचा प्रकार तालुक्यात चालू आहे. यातून लाखोंची उलाढाल होताना दिसतेय असे नागरिकांचे म्हणणे आहे. श्रीगोंदा व बेलवंडी पोलीस प्रशासन याकडे जाणीवपूर्वक लक्ष ठेवून दुर्लक्ष करत असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. याप्रक्रियेतुन मोठे अर्थार्जनही होत असल्याचे अनेकांचा आरोप आहे. तालुक्याला वाईट मार्गाला लावून हप्ते खोरीच्या माध्यमांतून स्व:स्वार्थ साधण्याचा हा खटाटोप तालुक्यातील जनतेपुढे मोठे संकट असल्याचे बोलले जात आहे.


तसेच, पोलीस यंत्रणेमार्फत कोरोना कालखंडामध्ये काहींना सवलत तर, काहींना दंड करत पोलीस ठाण्यासमोरील पार्किंग, शहरातील ट्राफिक व साथ प्रतिबंधक कायद्याच्या नावाखाली मोठी उलाढाल चालू आहे. यात जाणीवपूर्वक पावत्या केल्याचे तर, काहीही चूक नसतांना दंड केल्याचे अनेकांनी सांगितले आहे. कोरोनाच्या नियमांखाली किराणा दुकान, भाजीपाला दुकानदार, फळ विक्रेते तसेच जीवनावश्यक वस्तूंचे सर्व दुकान वेळेत बंद केले जातात. पाच-दहा मिनिटे इकडे तिकडे झाल्यास तेथेही शेकडो रुपयांचे दंड केल्याच्या घटना आहेत. मात्र, रात्रभर चाललेल्या हॉटेल्स, दारू विक्री, जुगार, मटका यांना थेट सूट देणाऱ्या पोलीस यंत्रने बाबत आणखी काय सांगावे.?

अनेकदा बाहेर ठिकाणावरून तालुका कार्यक्षेत्रात कर्तव्यावर आलेले अधिकारी त्यांची सरकारी यंत्रणा कार्यरत करून, तालुक्यातील काही गैर मार्गाच्या लोकांना ताकत देत, अनधिकृत व असंविधानिक व्यवसाय वाढीस कारण ठरत, सामान्यांच्या जीवाचा खेळखंडोबा तर करत नाहीत ना ? असा प्रश्न श्रीगोंदा तालुका वासियांना उपस्थित होत आहे.

या सर्व प्रकाराकडे  जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटिल साहेब यांनी लक्ष देण्याची मागणी जोर धरु लागली आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा