आता लढा ऊस वाहतूक वाहनमालकांनसाठी -
खुपसे पाटील
टेंभुर्णी (प्रतिनिधी)
कारखाना चालवण्यासाठी महत्वाची भूमिका निभवणारा वाहनमालकांचा कारखानदारांनी कधीच विचार केला नसून आता आपला लढा हा वाहनमालकांनसाठी राहणार असुन येणार्या 21 तारखेला पंढरपूर येता ट्रॅक्टर आंदोलन राहणार असुन वाहन मालकांनी कारखानदारांच्या दबावाला बळी न पडता आंदोलनात ट्रॅक्टर घेऊन उपस्थित राहण्याचे आवाहन जनशक्ती शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अतुल खुपसे यांनी केले.ते कन्हेरगाव ता.माढा येथे आयोजित वाहन मालक, शेतकरी संवाद कार्यक्रमात बोलत होते.
ते पुढे बोलताना म्हणाले की,कारखानदार नेहमीच कारखाना अडचणी आहेत म्हणत शेतकर्याना व ऊस वाहतुक दारांना अडचणीत आणत आहेत.डिझेलचे दर महाभयंकर वाढले,ड्रायव्हरची पगार वाढ,टायरची किंमत वाढलेले असताना ऊस वाहतुकीचे दर कधी वाढणार की वाहनमालकांची अशीच पिळवणूक करत वाहन मालकांची अशीच अधोगती करत राहणार असल्याचा सवाल अतुल खुपसे यांनी केला.
गेल्या अनेक वर्षांपासून ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर व ट्रक मालकांचे वाहतूकदर आणी कमिशन वाढवले नाहीच शिवाय त्यांच्यावर जप्ती सारख्या कारवाया कारखानदारांकडून केल्या जातात म्हणून आपल्या मागण्या कारखानदार व शासन दरबारी पोहोचविण्यासाठी 21 सप्टेंबर रोजी पंढरपूर मध्ये जनशक्ती संघटनेचे ट्रॅक्टर आंदोलन होणार असुन या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन अतुल खुपसे-पाटील यांनी केले...
यावेळी कन्हेरगावचे उपसरपंच दिपक डोके,सोसायटी संचालक बाबुराव डोके,विकास पाटील,अमित खोचरे,राजेंद्र केदार,प्रविण खोचरे,प्रमोद खोचरे,हर्षवर्धन माने,काका सरडे,विशाल माने आदी उपस्थित होते...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा