महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचे नेतृत्व खासदार हेमंत पाटील यांनी करावे- कृषीमंत्री दादाजी भुसे
--------------------------------------------------------------------------------------------------------------------
नांदेड प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
किनवट/माहूर: महाराष्ट्रातील हळदीला देशात प्रथम पसंती मिळावी याकरिता खासदार हेमंत पाटील मोलाचे कार्य करत आहेत.दर्जेदार हळद उत्पादन ही महाराष्ट्राची नवी ओळख निर्माण करावी आणि त्यांनी केवळ हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा विचार न करता, संपूर्ण महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचे नेतृत्व करावे, असे गौरव उदगार राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी हिंगोली येथे झालेल्या जिल्हा कृषी आढावा बैठकीत काढले.
राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या अध्यक्षतेखाली ,हिंगोली येथे कृषी योजना आणि जिल्ह्याची कृषी क्षेत्रातील प्रगती या संदर्भाने आढावा बैठक आयोजित केली होती.या बैठकीला खासदार हेमंत पाटील,आ.संतोष बांगर,जिल्हा परिषद अध्यक्ष गणाजी बेले, आ.तान्हाजी मुटकुळे, आ.राजू नवघरे, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, पोलीस अधिक्षक कलासागर,जि. प.सीईओ राधामोहन शर्मा, आदी उपस्थित होते. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी जिल्ह्यातील हळद बोर्ड,कृषी योजना,पीककर्ज ,पीकविमा यांचा आढावा घेतला. खासदार हेमंत पाटील यांनी सुरवातीला कृषीमंत्री दादाजी भुसे यांचे आभार व्यक्त केले कारण थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन समस्या जाणून घेत आहेत.मराठवाड्यात हळदीचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते पण त्याचे योग्य विपणन व वितरण होत नाही ही बाब कृषी मंत्री दादाजी भुसे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर हिंगोली जिल्ह्यातील हळद बोर्डाला सकारात्मक प्रतिसाद दिला आणि लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्या अध्यक्षतेखाली अभ्यास समिती स्थापन करून हळद बोर्डाच्या निर्मितीच्या दिशेने निर्णायक पावले उचलली . यामुळेच आपल्या भागातील उच्च प्रतीची हळद देशाच्या इतर भागात निर्यात करण्यास मदत होईल.अशी माहिती देत खासदार हेमंत पाटील पुढे म्हणाले की, हिंगोली जिल्ह्यासाठी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट ११६८ कोटीचे असताना केवळ ४८१ कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे.हे प्रमाण अत्यंत कमी म्हणजेच ४० टक्के असून शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात बँकांची उदासीनता बँक अधिकारी , कर्मचाऱ्यांची अरेरावी, राज्याच्या इतर जिल्ह्यात कर्ज वाटपाचे प्रमाण ७० टक्के असताना हिंगोली जिल्ह्यात मात्र शेतकऱ्यांना कर्ज वाटप केले जात नाही.बँकेकडून दिली जाणारी अपमानस्पद वागणुकी याबाबतच्या अनेक तक्रारी दररोज प्राप्त होत आहेत. यासर्व बाबी खासदार हेमंत पाटील यांनी कृषी मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावर कृषी मंत्र्यांनी आक्रमक भूमिका घेत जिल्हाअग्रणी बँक आणि पीकविमा बाबत विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. ते म्हणाले की, ज्या बँका शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज पुरवठा करणार नाहीत त्यांची रिजर्व बँकेकडे लेखी तक्रार करून शाखा बंद करण्यात येतील त्यामुळे शेतकऱ्यांना सन्मानाची वागणूक देण्यात यावी.अशी तंबी कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी दिली.
जिल्ह्यात सुरू असलेल्या विविध कृषी योजनांचा आढावा यावेळी घेण्यात आला. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे ५ कोटी निधी पडून आहे. त्याचे वाटप अद्याप पर्यंत झाले ,नसून यासंदर्भात बैठक घेऊन तात्काळ निधी वाटप करण्याचे निर्देश संबंधितांना दिले.सोबतच नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेत केवळ ४८ टक्के काम झाले असून उर्वरित गावांचे डीपीआर तयार करून काम सुरू करावे. आणि जनावरांच्या वाढत्या लम्पिस्किन आजाराबाबात योग्य त्या खबरदारीचा उपाययोजना कराव्यात असेही कृषी मंत्री म्हणाले.
खासदार हेमंत पाटील यांच्या प्रभावशाली कार्यामुळे हिंगोली मतदार संघ कात टाकत आहे.नवनवीन उद्योग व्यवसाय जिल्ह्यात येत असून हळद संशोधन व प्रक्रिया महामंडळामुळे नवी ओळख हिंगोली जिल्ह्याला अर्थात महाराष्ट्राला प्राप्त होणार आहे. खासदार हेमंत पाटील हे अत्यंत अभ्यासू आणि शेतकरीहित जपणारे लोकप्रिय खासदार आहेत.त्यानी आता महाराष्ट्रातील हळद उत्पादक शेतकऱ्यांचे नेतृत्व करावे. आणि राज्यातील हळदीला नवी ओळख निर्माण करून द्यावी. असेही कृषी मंत्री दादाजी भुसे म्हणाले .हळद बोर्ड स्थापन करण्याच्या उद्देशाने अभ्यास समितीने खासदार हेमंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली हळदीचे उच्च प्रतीचे बेणे यावर प्रक्रिया संशोधन करणे गरजेचे आहे.हळदीची योग्य ब्रँडिंग,योग्य बाजारभाव याचे नियोजन करावे.सोबतच मालाची स्वच्छता,ग्रेडींग पँकिंग, यातून शेतकऱ्यांना चार पैसे अधिकचे कसे मिळतील याकडेही लक्ष द्यावे असेही ते म्हणाले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा