लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांची बदली महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ व्यवस्थापकीय संचालक म्हणून अकोला येथे झाली आहे.त्यांच्या जागी परभणी येथील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणुन कार्यरत असलेले बी.पी.पृथ्वीराज हे लातूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारणार आहेत.
राज्याच्या अप्पर मुख्य सचिवांनी परिपत्रक काढत या संदर्भात माहिती दिली
जी.श्रीकांत यांनी कोरोना काळात लातूर जिल्ह्यात विविध उपाययोजना राबवत जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात आटोक्यात आणली होती. जी. श्रीकांत यांची व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या ठिकाणी बदली करण्यात आली आहे. जी श्रीकांत यांनी २७ एप्रिल २०१७ रोजी लातूर येथे जिल्हाधिकारी पदाची सुत्रे हाती घेतली होती,मराठवाडा पदवीधर निवडनुकीच्या मतदनाच्या दिवशी उन्हात रांगेत उभा असलल्या मतदारांना बसण्यासाठी स्वता: जी श्रीकांत यानी टेबल आणून त्यावरील धुळ साफ केली होती ,मतदारांना त्रास होउ नये या साठी त्यानी पदाचा बडगा न दाखवता केलेली कृती याची सर्वत्र चर्चा देखील झाली होती ,जिल्ह्यात अनेक चांगले उपक्रम राबत त्यानी लातूरचा विकास अधीक वेगाने करण्याचा पर्यत्न केला ,
विशेषता कोरोना काळात त्यांनी संसर्ग टाळण्यासाठी केलेले आवाहन सोशल मिडियाच्या माध्यमातून केलेली जनजागृती याची दखल राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही घेतली होती, त्यांच्या अँन्टी कोरोना पोलिस आणि अँन्टी कोरोना फोर्स या दोन योजनांचे अनुकरन राज्यभरात करण्यात आले होते, लातूरचे जिल्हाधिकारी असतानां काही दिवस त्यांच्या कडे महापालीका आयुक्त म्हणून देखील पदभार होता.
दरम्यान काही दिवसापूर्वी जी.श्रीकांत यांची लातुरचे महापौर विक्रम गोजमगुंडे यांचे कौतूक करताना तुमच्या सारखी व्यक्ती आमदार झाली पाहीजे अशी सदिच्या व्यक्त केली होती त्यानंतर काही दिवसांतच जी.श्रीकांत याची बदली अकोला येथे झाल्याने तर्क वितर्क निघत आहेत,नवीन जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी. पी.यांचे हार्दिक स्वागत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा