*दुर्बल घटकातील लोकांनी शासनाच्या योजनांचा फायदा घ्यावा* : -- *कामठे*
** पुणे*[ प्रतिनिधी ] श्रीकांत कापरे
पुणे प्रतिनिधी : -- केंद्र सरकार व महाराष्ट्र शासनाच्या अनेक योजना गोरगरिबांसाठी चालू आहेत . त्यातील अनेक योजना चा फायदा अनेक लोकांना झालेला आहे. अशाच प्रकारची एक योजना प्रधानमंत्री जन आरोग्य योजना म्हणजेच आयुष्यमान भारत योजना होय.ही योजना आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबासाठी असून याचा फायदा जास्तीत जास्त लोकांनी घ्यावा असे आव्हान निर्भय भारत संघटनेचे पुणे जिल्हा प्रमुख अक्षय कामठे यांनी आमच्या वार्ताहरांशी बोलताना सांगितले .
कोरोना महामारी ने संपूर्ण जगाला संकटाच्या खाईत लोटले आहे .सर्व उद्योग बंद आहेत. अनेक लोकांचे रोजगार बंद आहेत.त्यामुळे सर्वच लोकांचे अतोनात हाल होत आहेत. अशा या महामारी च्या संकटात , या संघटनेचे पदाधिकारी घरोघरी जाऊन गरीब व गरजू लोकांपर्यंत जाऊन या आयुष्यमान भारत योजनेची सविस्तर माहिती सांगून, जनजागृती करून ,आरोग्य कार्डचे वितरण करण्याचे काम चालू आहे. यामुळे प्रत्येक दुर्बल घटकातील कुटुंब प्रमुखाला आरोग्य कार्ड दिले जाते. त्यामुळे प्रत्येक लाभार्थ्यास महाराष्ट्रातील ४९५ खाजगी व शासकीय रुग्णालयाचा समावेश करण्यात आलेला आहे .यामध्ये पुणे जिल्ह्यातील २८ रुग्णालये समाविष्ट आहेत .या रुग्णालयांमध्ये जवळजवळ 1300 आजारावरती उपचार केला जातो .त्यामुळे निर्भय भारत संघटनेच्या माध्यमातून काम करत असताना , अनेक आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील कुटुंबांना या योजनेचा पुरेपूर फायदा करून दिला असून , भविष्यातही या संघटनेला सर्वांनी सहकार्य करून शासकीय योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन यावेळी श्रीयुत कामठे यांनी केले आहे.
यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष शंकर हिरगुडे , पुणे शहर प्रमुख विशाल माने , शहर सचिव संतोष होडे आदी मान्यवर उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा