Breaking

मंगळवार, २९ सप्टेंबर, २०२०

कुर्डुवाडी शहर"कोरोनो मुक्तीच्या" अंतिम टप्प्यात...* *


*कुर्डुवाडी शहर"कोरोनो मुक्तीच्या" अंतिम टप्प्यात...*
     
    *कुर्डूवाडी प्रतिनिधी अरुण कोरे*

      *कुर्डुवाडी शहरात वीस दिवसांपूर्वी कोरोनो स्फोटक परिस्थितीवर कुर्डुवाडी ग्रामीण रुग्णालय व नगरपालीका आरोग्य विभागाने शहर व परिसरातील नागरिकांच्या योजलेल्या"धडक तपासणी"स चांगलेच यश आले असून त्यांच्या कामगिरी बाबत सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे.*
        *वास्तविक पाहता वीस दिवसांपूर्वी आरोग्य खात्यातील अधिकारी व कर्मचारी पांच महिन्यांच्या अथक परिश्रमाने ब-यापैकी आजारी होते.परंतू वैयक्तिक आजाराकडे व अडचणीकडे दुर्लक्ष करून शहरावर घोंघावणारे कोरोनोचे सावट दूर करण्यासाठी ग्रामिण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ.संतोष अडगळे,डॉ.सौ.सुनंदा रणदिवे गायकवाड यांचें पथक व आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांचें पथक यांनी रुग्णांच्या संपर्कातील हाय रिस्क लोकांची यादी करून तपासण्यांची धडक मोहीम सुरू केली.*
        *गेल्या एकोणीस दिवसांत कुर्डुवाडी शहर व परिसरातील सुमारे १६५३ जणांच्या तपासणीतून ३२० कोरोनो पाॅझीटीव्ह रुग्ण आढळून आले आहेत.सुमारे वीस टक्के रुग्ण पाॅझीटीव्ह आढळून आले. त्यापैकी कुर्डुवाडी शहरातील १३०० जणांमध्ये २३५ रुग्ण पाॅझीटीव्ह आढळून आले. हे प्रमाण साधारण सतरा टक्के चिंतनिय आहे.यामध्ये ग्रामीण भागांतील साडेतीनशे रुग्णांमध्ये शंभरएक रुग्ण पाॅझीटीव्ह आढळले त्यांचे प्रमाण साधारण तीस टक्के आढळून आले.* 
       *कुर्डुवाडीचे नगराध्यक्ष समीर मुलाणी,उपनगराध्यक्षा सौ.उर्मिला हरिदास बागल,शिवसेना जिल्हाप्रमुख धनंजय डिकोळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक चिमणाजी केंद्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व नगरसेवक व नागरिकांच्या पांच दिवशीय "जनता कर्फू"चे घोषणेनंतर आरोग्य खात्याने धडक मोहीम युध्दपातळीवर राबविली.*
        *त्यानंतर तांत्रिक अडचणींमुळे कर्फू वाढवणे शक्य नसल्याने नागरिकांनी वाढत्या रुग्णांच्या अनुषंगाने चांगल्याच धसका घेऊन "स्वयंकर्फू"चा जाणतेपणाने केलेला अंमल चांगलाच पथ्यावर पडला.*
        *तरुणाईचा उपद्रव,व्यापार पेठेतील वाढीव रुग्णसंख्या याचाही बाजारपेठेतील व्यवहारांवर चांगलाच परिणाम दिसून आला.*
     *तपासणीचे धडक मोहीमेच्या दरम्यानच महाराष्ट्र शासनाच्या "माझं कुटुंब माझी जबाबदारी"या घोषित योजनेची नगरपालीकेने युध्दपातळीवर सुरू केलेली अंमलबजावणीही चांगलीच पथ्थ्यावर पडली.**
          *मुख्याधिकारी समीर भुमकर यांचें मार्गदर्शनाखाली आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांच्या नेतृत्वाखाली पर्यवेक्षक अतुल शिंदे,अभिजित पवार,नोडल अधिकारी कोमल वावरे,मुकदम सुरेश कदम, सहाय्यक मुकादम शिवाजी खवळे यांच्या अधिपत्याखाली बारा पथके तयार करून ३६ कर्मचा-यांनी"घर-टू-घर" व "माणूस-टू-माणूस"हेरुन तिहेरी यांत्रिक तपासणीद्वारे सुरू केलेली मोहीमही अंतिम टप्प्यात आली आहे.या तपासणीतील तीन पैकी दोन लक्षणें आढळल्यास त्यांना कोव्हिड केअर सेंटरला संदर्भित करण्याचे जिल्हाधिकारी यांचें आदेश असल्याचे आरोग्य निरीक्षक तुकाराम पायगण यांनी सांगितले.*
          *प्रांत अधिकारी श्रीमती ज्योती कदम व पोलीस उपअधीक्षक विशाल हिरे यांचें परिस्थितीवर चांगलेच लक्ष असून संयमाने परिस्थिती हाताळलेली दिसून येते.*
            *मात्र याच दरम्यान खाजगी वैद्यकीय क्षेत्रातील कांहींनी (बहुतांशांनी?) संशयीत रुग्णांच्या अनुषंगाने शासकीय नियमांची केलेली पायमल्ली,पाॅझीटिव्ह रुग्णांसंदर्भात त्यांची धरसोड वृत्ती,साधनसुविधा अभावी रुग्णांची झालेली हेळसांड व झालेले मृत्यू,वैद्यकीय क्षेत्रातील लूट,उपचारा दरम्यानची अनुभवींची अनभिज्ञता व अनुभवींची तर्कता याबाबत नागरिकांत उलट सुलट चर्चा होत असून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.*
     *कोव्हिड बाबत शासनाने कमीत कमी बिलांच्या संदर्भात जाहीर वाच्यता होऊनही लाखोंच्या संख्येने होणा-या बिलाबाबत नागरिकांना पडलेले कोडे मात्र उलघडता उघडेनासे झाले असल्याचे नागरिकांतून बोलले जात आहे.*

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा