Breaking

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०२०

*करमाळ्यात काँग्रेस पक्षाचे वतीने महात्मा गांधी जयंती साजरी*




*करमाळ्यात काँग्रेस पक्षाचे वतीने महात्मा गांधी जयंती साजरी*


*Aj 24Taas News Maharashtra
करमाळा प्रतिनिधी/अतुल वारे पाटील

          करमाळा येथे आज दि 2 ऑक्टोबर रोजी काँग्रेस पक्षाचे वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती निमित्त महात्मा गांधी यांच्या पुतळयाला सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हा सरचिटणीस सुनील सावंत यांनी  पुष्पहार घालून अभिवादन केले .


     यावेळी हाजी फारूक बेग. अशोक दोशी. फारूक जमादार. साजीद बेग. धन॔जय शिंदे. हाजी महमंदभई बागवान. अस्लम शेख. औदुंबर उबाळे अशोक काळे संभाजी गायकवाड सलीम शेख आदी जण उपस्थित होते 
               यावेळी बोलताना सुनील बापु सावंत म्हणाले की.राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून दिले तसेच सत्याग्रह आणि अहिंसा च्या माध्यमातून देश स्वतंत्र करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली व सन 1930 साली त्यांनी इंग्रजां विरोधात मिठाचा सत्याग्रह केला तर सन 1942 साली भारत छोडो आंदोलन केले महात्मा गांधी यांची साधी राहणी पवित्र आचरण आणि निर्भय वृत्ती पाहून सगळंयांनाच त्याच्या बद्दल फार आदर वाटायचा त्यांनी स्वदेशी ची चळवळ जोरात सुरू केली परदेशी वस्तुवर लोकांनी बहिष्कार घालावा परदेशी कपडे लोकांनी वापरू नये स्वतः चरख्यावर सुत कातुन त्याचे कापड विणून वापरत बापु ना अनेक वेळा तुरूंग वास भोगावा लागला 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताला स्वातंत्र्य मिळाले .भारताचा तिरंगी ध्वज लाल किल्ल्यावर फडकवला .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा