विवेकानंद युवा मंडळाला 'राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार'
प्रतिनिधी - प्रतिक भोसले
उस्मानाबाद (धाराशिव) - येथील विविध अशा सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा व शैक्षणिक कार्यात अग्रेसर मानल्या जाणाऱ्या विवेकानंद युवा मंडळाला 'राज्यस्तरीय समाज रत्न पुरस्कार २०२०' मिळाला आहे. मंडळाच्या आजपर्यंतच्या वाटचालीत त्यांनी केलेल्या समाजपयोगी उपक्रम त्यात कोरोना सारख्या महामारीच्या काळात मंडळाचे काम दुप्पट वेगाने वाढले. जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन विभाग, नगरपालिका या शासकीय कार्यालयांमध्ये विवेकानंद युवा मंडळाने अतिशय चोखपणे काम बजावले. अन्नदान वाटप, कपडे वाटप, मास्क वाटप, सैनीटायझर पीपीई किट तसेच नगण्य वाटप, मतिमंद मुलांना विविध सणावाराला हवी ती मदत,एकल महिलांना मदत, महिला बचत गटांचे नवनिर्माण व एकत्रीकरण करून त्यांची उद्योगाकडे वाटचाल असे विविध उपक्रम राबवून विवेकानंद युवा मंडळ समाजहितासाठी काम करत आहे. जिल्हाभरातून मंडळाच्या ४४ शाखा प्रशासकीय सेवेत दाखल आहेत. युवकांची खूप मोठी साथ असलेले मंडळ प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रत्येक ठिकाणी मदत करत आहे. मंडळाच्या सर्व कार्याचा आढावा घेऊन अजिंक्य बहुउद्देशीय संस्थेमार्फत पत्रकार भवन, पुणे येथे आयोजित असलेल्या कार्यक्रमामध्ये विवेकानंद युवा मंडळाला 'राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार २०२०' देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती माजी जलसंधारण व राजशिष्टाचार मंत्री मा.श्री.राम शिंदे साहेब, पुणे मनपा महिला व बालकल्याण समिती अध्यक्षा माधुरीताई सहस्त्रबुद्धे, महा एनजीओ फेडरेशनचे शेखरभाऊ मुंदडा, सेवानिवृत्त विशेष पोलिस महासंचालक विठ्ठलराव जाधव, अजिंक्य संस्थेचे राम जवान यांच्या हस्ते मंडळाला पुरस्कार देण्यात आला. यावेळी विवेकानंद युवा मंडळाचे संस्थापक अध्यक्ष बाळकृष्ण साळुंके, समन्वयक स्वप्नील देशमुख, सहसचिव महेंद्रप्रताप जाधव, शाखा विस्तारक कृष्णाभाऊ एडके व आदी कार्यकर्ते उपस्थित होते. राज्यस्तरीय समाजरत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल मंडळाच्या कार्यकर्त्यांचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा