*पाच दिवसात तीन निष्पाप लोकांचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर वनखात्याच्या सर्च ऑपरेशनमध्ये ठार*
*जेउर प्रतिनिधी/अलीम शेख*
जेऊर ( प्रतिनिधी ) करमाळा आष्टी बीड सह औरंगाबाद अहमदनगर सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात धुमाकूळ घालणाऱ्या तसेच पाच दिवसात तीन जणांचा बळी घेणारा नरभक्षक बिबट्या अखेर 17 दिवसांच्या वनखात्याच्या परिश्रमानंतर आज सायंकाळी साडेसहा वाजता वनखात्याच्या सर्च ऑपरेशनमध्ये ठार झाला आहे
औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी याशिवाय करमाळा तालुक्यात या नरभक्षक बिबट्याने अक्षरश थैमान घालून अनेकांचा बळी घेणारा बिबट्या आज अखेर वनखात्याच्या सर्च मोहिमेमध्ये ठार झाला या बिबट्याने तालुक्यातील कुंदेवाडी येथील कल्याण फुंदे अंजनडोह येथील सौ जयश्री शिंदे तसेच चिकलठाणा येथील ऊस तोडकरी यांची नऊ वर्षाची मुलगी कुमारी फुलाबाई कोटली यांचा या नरभक्षक बिबट्याने बळी घेतला होता याशिवाय या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची मागणी आमदार संजय मामा शिंदे माजी आमदार नारायण आबा पाटील तसेच आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी शासना कडे केली होती तर घटनास्थळाला वनमंत्री तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तामामा भरणे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आमदार रोहित दादा पाटील यांनी भेटी दिल्या होत्या
सदर बिबट्याला आज सायंकाळी साडेसहा वाजता वनविभागाच्या शार्प शूटर ने वांगी नंबर चार येथील राखुंडे वस्ती तिच्या केळीच्या बागेमध्ये गोळ्या घालून ठार केले
करमाळा सह अन्य तालुक्यात अक्षरश थैमान घालणाऱ्या या नरभक्षक का चा खात्मा करण्यासाठी वन खात्याने विशेष मोहीम आखली होती यामध्ये पुणे अहमदनगर येथील वनखात्याची टीम याशिवाय 21 पिंजरे 32 कॅमेरे 42 ट्रॅप कॅमेरे पाच शार्प शूटर दोन बेशुद्ध करणारे पथक एक डॉग स्कॉड अशा 16 वेगवेगळ्या टीम द्वारे रात्रंदिवस दीडशे कर्मचारी कोबी ऑपरेशन करत होते आज झालेल्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये वन व महसूल प्रशासनाला तब्बल 17 दिवसाच्या अथक परिश्रमानंतर बिबट्याला ठार मारण्यात यश आले आहे यामध्ये जिल्हा वन अधिकारी धैर्यशील पाटील करमाळा येथील वनपरिक्षेत्र अधिकारी शीतल नागराळे शार्प शूटर डॉक्टर चंद्रकांत मंडलिक हर्ष वर्धन तावरे यांनी विशेष मोलाची कामगिरी बजावली तसेच वन खात्यातील सर्व अधिकारी कर्मचारी तसेच पोलीस यांनी देखील महत्वाची कामगिरी केली
वन विभागाच्या कोम्बिंग ऑपरेशन मध्ये नरभक्षक बिबट्या ठार झाल्याने वनखात्याची अखेर चिंता दूर झाली असून करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला आहे नरभक्षक बिबट्या अखेर ठार झाल्याने याशिवाय तालुक्यात आणखीन किती बिबटे आहेत याबद्दल देखील उलट-सुलट चर्चा होत आहे
नरभक्षक बिबट्या ने करमाळा तालुका वाशी यांची अक्षरशः झोप उडवली होती अखेर वन विभागाच्या टीमने अहोरात्र परिश्रम करून बिबट्याचा अखेर खात्मा केला याबद्दल करमाळा तालुक्यातील नागरिकातून वनखात्याची विशेष विशेष आभार मानले जात आहे
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा