शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लोहा कंधार शहर कडकडीत बंद ; संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे यांनी बंदचे आवाहन करीत काढलीं रॅली
शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज दिनांक ८ डिसेंबर रोजी लोहा व कंधार शहरात १०० टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला.
केंद्र सरकारने कृषी विधेयक कायदा मागे घ्यावा या मागणीसाठी दिल्ली येथे संयुक्त शेतकरी संघटनेच्या आंदोलन चालू असुन आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज दिनांक ८ डिसेंबर संपूर्ण भारत बंदची हाक विविध शेतकरी संघटनेसह संपूर्ण विरोधी पक्षाने या बंदला पाठींबा दिला असून महाराष्ट्र मध्ये या भारत बंद च्या हाकेला शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षासह संभाजी ब्रिगेड,धर्मवीर शेतकरी संघटना,छावा युवा संघटना,आदी सामाजिक संघनेसह,विविध व्यापारी आघाडी यांनी या बंदला पाठिंबा दिला असल्याचे आज दिनांक ८ डिसेंबर रोजी लोहा व कंधार शहर १०० बंद व्यापार्यांनी स्वयंस्फूर्तीने बंद ठेवले.
यावेळी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष जिल्हाध्यक्ष सुभाष पाटील कोल्हे व धर्मवीर शेतकरी संघटनेचे संस्थापक बाळासाहेब जाधव, यांच्या नेतृत्वाखाली लोहा शहरात बंद चे आवाहन करून संभाजी ब्रिगेडच्या वतीने पायी रॅली काढण्यात आली यावेळी धर्मवीर शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण मोरे,संभाजी ब्रिगेडचे विधानसभा अध्यक्ष माधव घोरबांड,तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे हरबळकर,कंधार तालुकाध्यक्ष नितीन कोकाटे, कंधार तालुका उपाध्यक्ष संभाजी गायकवाड शहराध्यक्ष निलेश लुगारे संग्राम डिकले, शैलेश ढेंबरे, गजानन मोरे, विठ्ठल कदम,छावाचे बालाजी दिघे, किशोर स्वामी, हणमंत श्रीरामे, विजय कौशल्य यांच्यासह मोठ्या प्रमाणात संभाजी ब्रिगेड चे कार्यकर्ते उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा