Breaking

गुरुवार, १८ फेब्रुवारी, २०२१

आ.बबन दादा शिंदे विरोधकांनी तारतम्य ठेवून बोलावे. अन्यथा... जशास तसे उत्तर..-- संजय पाटील- भिमानगरकर*



*आ.बबन दादा शिंदे  विरोधकांनी तारतम्य ठेवून बोलावे.  अन्यथा... जशास तसे उत्तर..--  संजय पाटील- भिमानगरकर*    

   टेंभुर्णी प्रतिनिधी :-
माढा तालुक्याचे आमदार बबनदादा शिंदे यांच्या वर टिका करत असताना विरोधकांनी तारतम्य बाळगावे अन्यथा जशास तसेच उत्तर देण्यात येईल असा सज्जड इशारा जिल्हा परिषदेचे   माजी कृषी व पशुसंवर्धन सभापती संजय पाटील भिमानगरकर यांनी बुधवारी दि.  १७ फेब्रुवारी रोजी  टेंभुर्णी येथे  पत्रकार परिषदेत दिला. 

विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध झाली आहे.औपचारिकता बाकी आहे २१ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता होणाऱ्या सर्वसाधारण सभेत निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक कुंदन भोळे हे घोषणा करणार आहेत.

निवडणूक प्रोग्रॅम जाहीर झाल्यावर आ. शिंदे यांच्या राजकीय विरोधकांनी टेंभुर्णी येथे पत्रकार परिषद घेऊन तालुक्यात आजपर्यंत राजकीय इतिहासात सभ्यता सोडून कोणीही बोलले नव्हते परंतु कारखान्याच्या निवडणुकीत विरोधकांनी पत्रकार परिषदेत आ.शिंदे यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली त्यामुळे संजय पाटील भीमानगरकर यांनी सांगितले की विरोधकांनी तारतम्य ठेवून बोलावे अन्यथा विरोधकांनाही त्याच स्टाईलने उत्तर दिले जाईल कारखाना २५०० मे.टनावरून ११ हजार मे.टन रोजची गाळप क्षमता वाढली असताना गेली वीस वर्षे झाली कारखाना बिनविरोध होत आहे.आ.शिंदे यांचेवर असलेल्या शेतकऱ्यांच्या विश्वासामुळेच घडत आहे.वेळेवर ऊसबील,पोळा सनाला बील,दिवाळीला बील,घरपोच साखर हे फक्त आ.बबनराव शिंदेच करू शकतात. तसेच प्रत्येक निवडणुकीला वाढत्या क्रमांकाने निवडून येत आहेत याचे विरोधकांनी भान ठेवावे आम्ही विरोध केला होता पण कधी एवढ्या खालच्या पातळी पातळीला जाऊन बोलून असल्याचे यावेळी बोलताना सांगितले.
चौकट

सोळा हजार सभासद कारखान्याचे असताना विरोधकांना निवडणुकीत उभे राहण्यासाठी २१ उमेदवार निवडणूक लढविण्यास मिळत नाही त्याचे कुठेतरी विरोधकांनी आत्मचिंतन करावे.---संजय पाटील भिमानगरकर

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा