Breaking

बुधवार, ३ मार्च, २०२१

खटाव माण तालुका ऍग्रो लिमिटेड पडळ कारखान्याची १५ फेब्रुवारी पर्यंतची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा : प्रभाकर घार्गे*. *यंदाच्या हंगामात आजवर तब्बल ११३ कोटी वर्ग*


खटाव माण तालुका ऍग्रो लिमिटेड पडळ कारखान्याची  १५ फेब्रुवारी पर्यंतची ऊस बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर  जमा : प्रभाकर घार्गे*


*यंदाच्या हंगामात आजवर तब्बल ११३ कोटी वर्ग*

*वडूज प्रतिनिधी / शरद कदम*  

         खटाव माण तालुका अॅग्रो लिमिटेड , पडळ या साखर कारखाना गळीत हंगामास सुरुवात झाल्यापासून गेल्या १२६ दिवसांमध्ये पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण केले आहे. चालू गळीत हंगामा मधील १५ फेब्रुवारी पर्यंतचे उसाचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले असून हंगामाच्या सुरुवातीपासून व्यवस्थापनाने आर्थिक नियोजन योग्य पद्धतीने व काटकसरीने केल्यामुळे शेतकरी ,तोडणी व वाहतूकदार यांची बिले वेळेत व नियमित देणे शक्य झालेले आहे अशी माहिती कारखान्याचे चेअरमन माजी आमदार प्रभाकर घार्गे व को-चेअरमन मनोज दादा घोरपडे यांनी दिली.
          मागील वर्षी कोरोणाच्या संकटामुळे शेतकरी ऊस उत्पादक यांना कर्जपुरवठा करणाऱ्या  संस्था /बँका यांची देणी शेतकऱ्यांना वेळेत देता आली नव्हती.त्यामुळे शेतकऱ्यांना देणे देणे अडचणीचे झाले आहे. या अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना मदत व्हावी याकरता खटाव माण ऍग्रो लिमिटेड,पडळ साखर कारखान्याच्या व्यवस्थापनाने एक मार्च २०२१पासून पुढील गळीतास येणाऱ्या उसाला काटा पेमेंटने पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच त्या उसाची बिले शेतकऱ्यांच्या खात्यावर त्वरित जमा करण्यात यावी असा ठराव कारखान्याच्या संचालक मंडळाने केला आहे.,
     आज अखेर पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपा बरोबरच कारखान्याने दोन कोटी पाच लाख युनिट विज महावितरण कंपनीला निर्यात केली असल्याची माहिती कार्यकारी संचालक संग्राम बापू घोरपडे यांनी दिली .तसेच कारखान्याने डिस्टीलरी प्रकल्प उभारणीस प्रारंभ केला आहे. येणार्‍या सण २०२१-२२  च्या गळीत हंगामात ऊस गाळपा बरोबरच इथेनॉलचे उत्पादन देखील पूर्ण क्षमतेने घेण्यात येणार आहे. सदरचा डिस्टीलरी प्रकल्प प्रति दिन एक लाख लिटर उत्पादनक्षमतेचा आहे. डिस्टिलरीच्या जादा उत्पादनामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांना येणाऱ्या पुढील गळीत हंगामात जास्त दर देणे शक्य होईल.
        चालू गळीत हंगाम सात लाख मेट्रिक टन गाळपाचे उद्दिष्ट  असून कारखाना पूर्ण कार्यक्षमतेने सुरू आहे. तसेच शेतकऱ्यांची बिले वेळेत दिल्यामुळे शेतकरी, तोडणी, वाहतूकदार व कामगार यांचेतुन समाधान व्यक्त होत आहे. या वेळी कारखान्याचे सर्व संचालक, अधिकारी वर्ग, जनरल मॅनेजर अशोक नलवडे उपस्थित होते.


चौकट :- गेल्या तीन वर्षांपासून खटाव सारख्या दुष्काळी भागातील उभा राहिलेल्या या प्रकल्पाचा यंदाचा हंगाम उच्चांकी ठरणार असून कारखाण्याकडून उच्चांकी गाळप,उच्चांकी वीज युनिट निर्मिती,व उच्चांकी बिलाची रक्कम तब्बल११३ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात आली असून कारखान्याच्या कार्यक्षेत्रांतील शेतकऱ्यांसाठी "खटाव-माण अँग्रो " हा प्रकल्प आर्थिक सुबत्ता आणणारा ठरत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा