Breaking

शनिवार, १३ मार्च, २०२१

वीजुरवठा पूर्ववत न झाल्यास तीव्र आंदोलन करणार - गणेश चिवटे*



*वीजुरवठा पूर्ववत न झाल्यास तीव्र आंदोलन करणार - गणेश चिवटे*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

    करमाळा तालुक्यातील वीज वितरण कंपनीने शेती पंप तसेच घरगुती वीज कनेक्शन वीज बिल भरले नसल्याने तोडले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना  भरपूर त्रास सहन करावा लागत आहे.  हे कनेक्शन त्वरित जोडण्यात यावे यासाठी  भाजपाचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी   निवेदन नायब तहसीलदार जाधव  यांना दिले.
      सद्यस्थितीत शेतकऱ्यांचा माल अजून शेतीमध्येच आहे तसेच ऊस बिल मिळालेले नाही त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक तारांबळ उडाली आहे आणि या स्थितीत वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वीज कनेक्शन तोडलेले आहेत त्यामुळे  फळ,भाज्यांचे तसेच पिकांचे भरपूर नुकसान होत आहे. या संदर्भात आम्ही पाठीमागच्या वेळेस आंदोलन करून  वीज वितरण अधिकाऱ्यांना  निवेदन दिले होते पण त्यावर अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले.त्यामुळे सदर वीज वितरण अधिकाऱ्यांना तहसीलदारांनी आदेश देऊन तोडलेले वीज कनेक्शन पूर्ववत करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल असे निवेदन दिले.
         यावेळी भाजपचे विस्तारक भगवानगिरी गोसावी, तालुका उपाध्यक्ष काकासाहेब सरडे,  युवा मोर्चा तालुकाध्यक्ष सचिन गायकवाड, घोटीचे सरपंच सचिन राऊत, वरकुटे चे सरपंच दादासाहेब भांडवलकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष विजयकुमार नागवडे ,शेलगाव ग्रा. प. सदस्य दत्तात्रय पोटे, खडकीचे युवा नेते मोहन शिंदे,अजिनाथ सुरवसे, अशोक ढेरे, रयत क्रांती संघटनेचे राज्य कार्यकारणी सदस्य अजय बागल, जयंत काळेपाटील आदीजन उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा