*तुळजापूर नगर परिषदेच्या वतीने कृषी दुकानदारांना नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा- वैभव पाठक*
*तुळजापूर येथे नगर परिषदेच्या वतीने कृषी अवजारे, बियाणे आणि खते, विक्रेत्यांना नगरपरिषदेचा इशारा, नियमांचे पालन करा अन्यथा कारवाई, कृषी संबंधित दुकानदारांना बजावली नोटीस*
Covid-19 उद्भवलेल्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी करावयाच्या उपाययोजना म्हणून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र कोव्हिड 19 उपाययोजना नियम 2020 प्रसिद्धी केले असून रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू केलेल्या आहेत, आपण आपला व्यवसाय करताना खालील सूचनांचे काटेकोरपणे पालन करून त्याचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घ्यावी १) कोणत्याही साहित्याची विक्री तोंडाला मास्क असल्याशिवाय करू नये,२) दुकानांमध्ये सॅनिटायझरचा पुरेसा स्टॉक करून ठेवावा, व येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला त्याचा वापर करणे बाबत सूचना देण्यात याव्यात,३) सोशल डिस्टंसिंग चे तंतोतंत पालन करावे,४) आपल्या कामगारांच्या वेळोवेळी कोरोणा चाचण्या करान्यात याव्या,५) आपल्या दुकानांमध्ये थर्मल स्कॅनर व ऑक्सीमिटर याचा वापर करण्यात यावा, व कोरोणाचे कोणतेही लक्षण आढळून आल्यास त्या व्यक्तीला कोरोना केअर सेंटर किंवा उपजिल्हा रुग्णालयात भरती करावे,६)आपल्या दुकानाची वेळ सकाळी ०७ ते दुपारी २ इतकीच निर्धारित केलेले असून, त्या व्यतिरिक्त इतर वेळेस दुकान उघडू नये, वरील नियमांचे उल्लंघन केल्यास आपणा विरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ चे कलम ५१ ते ६० तसेच भारतीय दंड संहिता (४५ ऑफ १९६०) कलम १८८ तसेच इतर लागू होणार या तरतुदीनुसार कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशी नोटीस बुधवार दिनांक २६ मे २०२१, रोजी तुळजापूर शहरातील ३५ कृषी दुकानदारांना देण्यात आली आहे, यावेळी, कार्यालय अधीक्षक वैभव पाठक,दंड पथक प्रमुख,सज्जन गायकवाड, वैभव अंधारे, संतोष इंगळे, न्यानेश्वर टिंगरे,बापू रोचकरी, विश्वास मोठे,दनाने,नागेश काळे,प्रमोद माळी,सह नगर परिषदेचे कर्मचारी उपस्थित होते,
प
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा