Breaking

गुरुवार, ६ मे, २०२१

अकार्यक्षम राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे निषेध आंदोलन*



*अकार्यक्षम राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात संभाजी ब्रिगेडचे निषेध आंदोलन*
*करमाळा तालुका प्रतिनिधी - अतुल वारे पाटील*
     अकार्यक्षम राज्य व केंद्र सरकारमुळेच सर्वोच्च न्यायालयात मराठा आरक्षण अवैध ठरल्यामुळे सरकारचा निषेध करत संभाजी ब्रिगेडच्या वतीने करमाळा येथे आंदोलन करण्यात आले.
       राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात यावेळी  घोषणा देण्यात आल्या.तहसीलदार समीर माने  यांना  मागण्याचे निवेदन देण्यात आले.  यावेळी मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष अतुल वारे पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ, जिल्हा संघटक गणेश सव्वासे, तालुकाध्यक्ष अमित घोगरे, वीर भगतसिंग विद्यार्थी संघटनेचे सत्यम सूर्यवंशी, सुधीर पोळ,विशाल पोळ,लहू पोळ,गणेश नाईकनवरे, अनिकेत आरणे, हनुमंत घोरपडे आदी उपस्थित होते.  सोशल डिस्टनसिंग नियमांचे काटेकोरपणे पालन करत हे आंदोलन करण्यात आले.
 यावेळी बोलताना जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ म्हणाले की, राज्य सरकार कितीही पोटतिडकीने सांगत असले की आम्ही आरक्षण टिकवण्यासाठी प्रयत्न केले हे धादांत खोटे असून राज्य व केंद्र सरकारच्या निष्करीयपणामुळेच मराठा आरक्षणाचा घात झाला आहे.सरकारने तात्काळ हालचाली करून मराठा समाजाला न्याय द्यावा अन्यथा संभाजी ब्रिगेड आता आर या पारची लढाई लढेल. मराठा समाजाच्या संयमाचा आता अंत झाला असून मराठ्यांचे रौद्र रूप पाहायला मिळेल असा इशारा त्यांनी यावेळी दिला. संभाजी ब्रिगेड तालुकाध्यक्ष अमित घोगरे म्हणाले की, मराठा समाजाचा सरसकट ओबीसी मध्ये समावेश करावा  ही मागणी मराठा सेवा संघ- संभाजी ब्रिगेड अनेक वर्षांपासून करते आहे. ओबीसींना न दुखवणाच्या  राज्यकर्त्यांच्या अवास्तव भूमिकेमुळे मराठा आरक्षणाचा बळी गेल्याची टीका त्यांनी यावेळी केली.
          जिल्हा संघटक गणेश सव्वासे यांनी राज्य सरकारने कोणत्याही परिस्थितीत मराठयांना आरक्षण देने ही सरकारची जबाबद असून मराठा विद्यार्थी व युवकांना न्याय न मिळाल्यास संभाजी ब्रिगेड तीव्र जनआंदोलन उभारणार असल्याचा इशारा यावेळी दिला.
  निवासी नायब तहसीलदार जाधव यांनी निवेदन स्वीकारले तसेच संभाजी ब्रिगेडच्या मागण्या व समाजातील असंतोष  वरिष्ठांपर्यंत पोचवण्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा