Breaking

मंगळवार, ११ मे, २०२१

बियाणे खते कीटकनाशकांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथके स्थापन करावीत.जिल्हा प्रशासनाकडे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची मा



बियाणे खते कीटकनाशकांचा काळाबाजार रोखण्यासाठी कृषी विभागाने भरारी पथके स्थापन करावीत.

जिल्हा प्रशासनाकडे पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेची मागणी.

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

खरीप हंगाम तोंडावर आला असून  कोरोणाच्या व मागील वर्षाच्या अस्मानी संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे,खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यानी वाढवलेले खताचे दर,बाजारातील सोयाबीन बियाण्याची उपलब्धता व मागणी यासर्व गोष्टीचा विचार करून बोगस बियाणे व बाजारातील काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने स्वतंत्र यंत्रणा स्थापन करून भरारी पथकाची निर्मिती करावी अशी मागणी मा.जिल्हाधिकारी,मा.जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पद्मश्री डॉ विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषदेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष भागवत देवसरकर यांनी केली आहे.

मागील वर्षी नांदेड जिल्ह्यामध्ये बोगस सोयाबीन बियाणेमुळे बहुतांश भागात बियाणांची उगवण झाली नाही,काही ठिकाणी दुबार पेरणी झाली त्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला होता,जिल्हाभरात बोगस सोयाबीन बियाणेच्या असंख्य तक्रारी कृषि विभागाकडे प्राप्त झाल्यानंतर शासन दरबारी हालचाल सुरू झाली होती,गेल्या वर्षीच्या तुलनेत खताचा किमती यावर्षी आवाक्याच्या बाहेर गेल्या आहेत, त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे यंदाच्या खरीप हंगामात कृषी विभागाने अधिक दक्ष राहून बाजारात काळाबाजार होऊ नये यासाठी आधी प्रबंध,उपाययोजना करून ठेवणे गरजेचे आहे,बाजारात खत,औषध व बियाण्यांचा काळाबाजार करणाऱ्यावर कठोर कारवाई करावी,जिल्हास्तरीय प्रशासनाने प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी स्वतंत्र भरारी पथकाची स्थापना करून तात्काळ योग्य त्या सर्व उपाययोजना कराव्यात अशी मागणी भागवत देवसरकर यांनी केली आहे.
 यावेळी जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा गायकवाड,विजयराव चव्हाण,प्रशांत आबादार,पांडुरंग पोपळे,विनीत पाटील,सतीश चव्हाण शिवशंकर थोटे,श्रीकांत शिंदे,पवन सूर्यवंशी अविनाश कदम वायपणकर,शेख रहीम,मारोती पवार सोनू देशमुख भगवान कदम विलास माने,साहेबराव सूर्यवंशी, पिंटू पाटील गाडे मोतीराम पवार गजानन वरपडे,जयकांत मोरे,कपिल पाटील तडखिले,नामदेव नरवाडे,बालाजी पाटील लखमापूरकर,नंदू पाटील,महेश गोरेगावकर,अनिल देवसरकर,आदी पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा