नुकसानग्रस्त शेतीची सा. जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी...
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
किनवट:-तालुक्यातील मौजे. दिग्रस येथे पावसामुळे झालेल्या नुकसानग्रस्त शेतीची आज किनवट सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी दिग्रस येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी करून शेतकऱ्यांशी संवाद साधला.
तसेच आरोग्य उपकेंद्र दिग्रस येथे भेट देऊन लसीकरणा संबंधी व आरोग्य सेवेबद्दल समस्याचा आढावा यावेळी त्यांनी घेतला.
यावेळी दिग्रस ग्रामपंचायतच्या वतीने सामाजिक कार्यकर्ते बाळू पाटील पवार यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार व तहसीलदार उत्तम कागणे यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी सा.जिल्हाधिकारी किर्तीकिरण पुजार तहसीलदार उत्तम कागणे मंडळ अधिकारी सानप तलाठी शितल ढाकुलकर कृषी सहाय्यक ताडेवार मॅडम शिवाजी जाधव, बाळू पाटील पवार,बाळु कदम वामनराव जाधव भगवान बामण सुभाष मेटकर अवधुत कदम मधुकर कदम मचीद्र यरवाळ देउ भाभडदे शंकर देशमुखे,आर्शद पठाण,आदित्य कदम,बाबु कांदे,बाळु बडे,धोंडबा गादेवाड,काशीनाथ गव्हाळे,एकनाथ आरमाळकर
यांच्या सह गावातील शेतकरी उपस्थित होते...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा