Breaking

सोमवार, १९ जुलै, २०२१

केंद्र सरकारने इंधन दरवाढ मागे घ्यावी - रणजितसिंह देशमुख वडूज येथील तहसिल कार्यालयावर राष्ट्रीय कॉग्रेसचा सायकल मोर्चा


केंद्र सरकारने इंधन दरवाढ मागे घ्यावी - रणजितसिंह देशमुख 
वडूज येथील तहसिल कार्यालयावर राष्ट्रीय कॉग्रेसचा सायकल मोर्चा 

वडूज प्रतिनिधी / शरद कदम 

         केंद्र सरकारने आपल्या पाशवी सदस्य संख्येच्या जोरावर भारतीय लोकशाही व तमाम जनतेच्या मनाचा व आर्थिक परिस्थितीचा कोणताही विचार न करता गेल्या काही वर्षापासून दररोज पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅसच्या किंमतीत भरमसाठ वाढ सुरू केली आहे. केंद्र सरकारच्या हुकुमशाही विरोधात जनतेमध्ये प्रचंड नाराजी असून जनतेच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून ही इंधन दरवाढ मागे घेऊन जनतेला दिलासा देण्याच आवाहन राष्ट्रीय कॉग्रेसचे प्रदेश प्रतिनिधी रणजितसिंह देशमुख यांनी वडूज येथे केले.
          यावेळी माहिती देताना रणजितसिंह देशमुख म्हणाले, केंद्र सरकारच्या इंधन दरवाढ व महागाईच्या निषेधार्थ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिलेल्या कार्यक्रमानुसार खटाव तालुका राष्ट्रीय कॉग्रेसच्या वतीने वडूज तहसिल कार्यालयावर सायकल रॅली मोर्चा काढण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, सरचिटणीस संजीव साळुंखे, बाजार समितीचे माजी सभापती अशोकआबा गोडसे, तालुकाध्यक्ष डॉ.विवेक देशमुख, खटाव - माण विधानसभा अध्यक्ष डॉ.महेश गुरव, संजय गांधी निराधारचे तालुकाध्यक्ष विजय शिंदे, युवक कॉग्रेसचे तालुकाध्यक्ष राजेंद्र खाडे, दाऊदखान मुल्ला, प्रवक्ते अॅड संतोष भोसले, भरत जाधव, अर्जुन गोडसे, डॉ.संतोष गोडसे, परेश जाधव, टिल्लू बागवान, अनिल कचरे, निलेश घार्गे आदिंची उपस्थिती होती.
          गेल्या काही महिन्यापासून खाद्य तेलासह इतर जीवनावश्यक वस्तुंच्या दरवाढीस प्रोत्साहनच दिले आहे. या सर्व वस्तुंची दरवाढ होण्यास केंद्र शासनाचे चुकीचे धोरण कारणीभूत असून त्या विरोधात देशातील तमाम जनता आक्रोश करीत आहे. गेल्या काही वर्षापासून कच्या तेलाच्या किंमती कमी असूनही केवळ केंद्र सरकारच्या चुकीच्या व हेकेखोरपणाच्या धोरणामुळेच भारतीय बाजारपेठेत पेट्रॉल, डिझेल व घरगुती गॅसच्या दरात अगदी प्रत्येक दिवशी दरवाढ होताना दिसत आहे. वास्तविक इंधनाच्या किंमती वाढतच परिणामी वहातूक व्यवस्था महाग होऊन इतर सर्वच गोष्टींच्या किंमती वाढताना दिसत आहेत. तर गेल्या काही महिन्यापासून खाद्य तेलासह सर्वच डाळी व जीवनावश्यक वस्तुंच्या दरात जवळपास दुप्पटीने दरवाढ झाल्याने भारतीय सर्वसामान्य जनतेचे आर्थिक कंबरडे मोडले असून त्यांचे जगणे मुश्कील झाले आहे. या सर्व वस्तुंची दरवाढ होण्यास दिल्लीतील भाजपप्रणीत केंद्र सरकारचे अत्यंत चुकीचे धोरण कारणीभूत असून दिल्लीश्वरांना भारतीय जनतेशी कसलेही देणेघेणे नाही असे मत जिल्हाध्यक्ष डॉ.सुरेश जाधव यांनी व्यक्त केले.
         या जीव घेण्या महागाई विरोधात व भाजपप्रणीत केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरोधात भारतीय जनतेचा आवाज केंद्र सरकारपर्यंत पोहचविण्यासाठी महाराष्ट्र कॉग्रेस कमिटीच्या आदेशाने खटाव तालुका राष्ट्रीय कॉग्रेस पक्षाच्या वतीने सोमवार दि १९ रोजी महाराष्ट्र राज्य शासनाच्या कोरोना महामारीतील सर्व नियमांचे पालन करून वडूज येथील हुतात्मा स्मारकापासून ते तहसिल कार्यालयापर्यत सायकलसह निषेध मोर्चाचे आयोजन केले होते. यावेळी वडूज तहसिलदार यांना निवेदन देण्यात आले. कार्यक्रमास राष्ट्रीय कॉग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा