छत्रपती शिवाजी महाराजांचा जीर्ण झालेला पुतळा त्वरित नवीन बसवा- संभाजी ब्रिगेड
आमदार, नगराध्यक्ष, सा. जिल्हाधिकाऱ्यांना संभाजी ब्रिगेडचे निवेदन...
नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
किनवट शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीर्ण झालेल्या पुतळ्याच्या जागी नवीन पुतळा बसविणे व शिवाजीराजे मंगल कार्यालयाची दुरुस्ती करून मंगलकार्यालया भोवती संरक्षणभिंत बांधणे यासंदर्भात आज संभाजी ब्रिगेडच्या वतीने मा.आमदार भीमराव केराम नगराध्यक्ष आनंद मच्छेवार सहाय्यक जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले...
छत्रपती शिवाजी महाराज हे मराठी मनाचे आराध्य दैवत असून किनवट शहरात 1964 पासून शिवाजी महाराजांचा पुतळा आहे.आज महाराजांच्या पुतळ्याची अवस्था जीर्ण झाली आहे. जर या पावसाळ्यात हा पुतळा पडला तर प्रचंड सामाजिक तेढ निर्माण होऊन महाराष्ट्रात याचे तीव्र पडसाद उमटल्याशिवाय राहणार नाही.त्यामुळे या बाबींकडे गांभीर्याने लक्ष देण्यात येऊन पुतळा ताबडतोब निष्काशीत करण्यात यावा.या विषयी आम्ही स्वतः नगराध्यक्ष आनंद मच्छेवार यांच्याशी विचारणा केली आहे. परंतु अद्याप काहीही झालेले नसल्याने काही दुर्दैवी घटना घडल्यास नगरपालिका प्रशासन जबाबदार राहील.
तसेच किनवट शहराच्या मधोमध व पार्किंग ची व्यवस्था असलेले छत्रपती शिवाजी महाराज मंगलकार्यालय आहे या मंगल कार्यालयाची अवस्था अत्यंत वाईट झाली असून कुणाला फायदा पोहोचण्यासाठी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात येत आहे.गोर गरीब नागरिकांना परवडणारे मंगलकार्यालय आज धूळखात पडून दारुड्यांचा अड्डा बनले आहे.या ठिकाणी अतिक्रमण होण्याची दाट शक्यता आहे.
तेव्हा वरील विनंतीचा सहानुभूतीपूर्वक विचार करून शिवाजी महाराजांचा पुतळा लवकरात लवकर निष्काशीत करावा व छत्रपती शिवाजी महाराज मंगलकार्यालयाची दुरुस्ती करावी व गोर गरीबांचा फायदा करावा.पुतळा संदर्भात लवकर निर्णय घ्यावा जेणेकरून सामाजिक तेढ निर्माण होणार नाही.येत्या आठ दिवसात यावर निर्णय घेतला नाही तर सदनसिर मार्गाने रास्तारोको व नगरपरिषदेत आंदोलन करण्यात येईल.असा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.
संभाजी ब्रिगेडच्या शिष्टमंडळासोबत मा.आमदार भीमराव केराम नगराध्यक्ष आनंद मच्छेवार नगरसेवक अभय महाजन यांनी चर्चा करून लवकरच समिती गठीत करून छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा बसविण्याचे आश्वासन दिले...
या निवेदनावर संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रसिद्धी प्रमुख बालाजी सिरसाट, तालुकाध्यक्ष सचिन कदम,गोविंद आरसोड,आकाश इंगोले,शिवा पवार,शुभम हसबे रितेश मंत्री,चंद्रकांत साळवे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा