*उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही:- नितीनभाऊ झिंजाडे*
*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*
करमाळा-माढा मतदार संघाचे आमदार संजयमामा शिंदे यांच्या कथित शेतकरी बोगस कर्जप्रकरणी राज्याचे नेते उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार साहेब यांना खेचने चुकीचे आहे.यामध्ये महाराष्ट्र अपडेट या न्युज पोर्टलवर *एक बोगस कर्जप्रकरण दबले की दाबले* अशा मथळ्याखाली बातमी प्रकाशित झाली असून त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा उल्लेख चुकीच्या पद्धतीने केला गेला आहे.त्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची याप्रकरनात कोणतीही बदनामी खपवून घेतली जाणार नाही असे राष्ट्रवादी पदवीधर संघाचे प्रदेश सदस्य नितीनभाऊ झिंजाडे यांनी म्हटले आहे.
याबाबत बोलताना ते म्हणाले की,बोगस कर्जप्रकरणी आंदोलन करणारे अतुल भैरवनाथ खुपसे पाटील यांनी पुरावे गोळा करून आंदोलन केले होते.शेतकऱ्यांना न्याय न भेटल्यास ईडीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्याचे जाहीर केले होते.याचे पुढे काय झाले हे लोकांना समजले नाही? एवढेच नाही तर खूपसे पाटील यांनी ते सर्व पुरावे त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाखल केली आहेत.देवेंद्र फडणवीस यांची याबाबतची चुप्पी अनाकलनीय आहे ?
ना.अजितदादांनी यापुर्वीच पत्रकारांना स्पष्टपणे सांगितले होते.पुरावे द्या,कारवाई करू.मग अतुल खूपसे पाटील यांनी ना.अजितदादा पवार साहेबांकडे पुरावे सादर करण्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पुरावे का सादर केले याच गमक काय? याची उत्तरे आधी राष्ट्रवादी व पवार विरोधकांनी द्यायला हवीत असे त्यांनी शेवटी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा