*कुर्डुवाडी व माढा तालुक्याचे कै.आ.गणपतराव देशमुख यांचे ऋणानुबंध...*
*दुष्काळी माढा तालुक्याच्या पाणीप्रश्नी कै.भाई आबा एस.एम.तात्याच्या खांद्याला खांदा लावून पंचवीस वर्षें ग्राउंडवर लढले ...*
*मंत्री होऊन आले अन् स्टेशनवरून चालत स्टॅडला गेले...*
*बैलगाडी मोर्चाने प्रशासन हादरले...*
*✒️कुर्डुवाडी विशेष बुलेटिन✒️*
*अरुण कोरे (पत्रकार) यांजकडून. .*
*सांगोला तालुक्याप्रमाणेच माढा तालुकाही बारमाही दुष्काळी.शेतीच्या पाण्यासाठी असंख्य मोर्चे १९७२ ते १९९५ पर्यत कुर्डुवाडी येथील जुन्या प्रांत कार्यालयावर (आताच्या भिमनगर) निघाले.त्याचे नेतृत्व आ.गणपतराव आबा व भाई एस.एम.पाटील तात्या यांनी केले.या मोर्चाला जिल्ह्यातील शेकाप कार्यकर्ते हजर रहात असलेने शहरातील नागरिकांची त्यांची रोखठोक भाषणे ऐकण्यासाठी प्रांत कार्यालयासमोरील रेल्वे भरावावर प्रचंड गर्दी होत असे.(आम्ही त्याकाळी प्रांत कार्यालयाच्या आवारात रहात असू)*
*कुर्डुवाडी प्रांत कार्यालयावर १९७३ साली काढलेला भव्य बैलगाडी मोर्चाने तर प्रशासन व पोलिस खातं हादरवून सोडले होते.जिल्ह्यातून आलेल्या शेतकऱ्यांच्या बैलगाड्याने प्रांत कार्यालयासमोरील पटांगण, रस्ते तर व्यापलेच होते पण शेंकडों बैलगाड्यांचे शेवटचे टोक माढा रस्त्यांला होते.रेल्वेही पाच सहा तास बंद ठेवावी लागली होती.इतका प्रचंड ऐतिहासिक बैलगाडी मोर्चा होता तो.*
*शिस्तप्रिय मोर्चा, बेंबीच्या देठापासून मागण्यांच्या घोषणा, शिष्टमंडळ,अधिका-यांवर वचक आदी आबा-तात्यांनीच करो जाणे.त्यांच्याबरोबर कुर्डुवाडीचे माजी नगराध्यक्ष डॉ.कुतल शहाही असतं.*
*आबांची दुसरी कुर्डुवाडीची आठवण म्हणजे आबा "पुलोद"च्या काळात पहिल्यांदा मंत्री होऊन कुर्डुवाडीस सर्व मंत्र्यांप्रमाणे तत्कालीन मेल एक्स्प्रेसने सकाळी सहा वाजता येणार असल्याने त्यांच्या स्वागतासाठी प्रचंड गर्दी झाली होती.आबा नेहमीप्रमाणे बॅग हातात घेऊन स्टेशनवर उतरले.एस.टी.चे अधिकारी व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.समोरच शासकीय एस्काॅर्टची गाडीही उभी होती.सर्वजण आबांची बॅग घ्यायला सरसावले.(त्यावेळचे वहातूक निरिक्षक व सध्या सिनियर सिटीझन अध्यक्ष किरण गोडसेसह) त्यांनी बॅग तर कुणाला दिली नाही...उलट सर्वांना म्हणाले मी आज मंत्री झालो उद्या नसल्यावर कोण बॅग घेणार? चला निघू.*
*दरम्यान पोलिस अधिकारी गर्दीला हटवून एस्काॅर्ट गाडीकडे जाण्यासाठी पुढे सरसावले तर आबांनी विनम्रपणे नकार देत कार्यकर्त्यांसह नेहमीच्या खुश्कीच्या रेल्वे गेट वरुन निघून चालतच पंढरपूर रोडवरील एस.टी.स्टॅड गाठले... तेही हाती आपली नेहमीची मळकट काळीसुटकेस घेऊन.(असाच स्टेशन ते स्टॅण्ड चालत प्रवास आमदार असताना मुख्यमंत्री विलासराव देशमुख करीत.)*
*आबा-तात्यांनी असाच एक बैलगाडी मोर्चा माढ्याच्या तहसील कार्यालयावर काढला होता.त्या मोर्चाचे नेतृत्व कै.नागन्नाथ अण्णा नाईकवाडी यांनी केले होते.याही मोर्चाचे वैशिष्ट्य म्हणजे कार्यकर्त्यांसाठी या तिन्ही नेते मंडळींनी गाड्या भरून पिठलं भाकरी स्वतःच्या घरुन स्वखर्चाने करुन आणल्या होत्या.*
*शेटफळ चौक, मोडनिंब, टेंभुर्णी,वैराग येथेही अनेक मोर्चे,रास्ता रोको आंदोलने झाली त्याचं नेतृत्व आबांनी केली.*
*माढा तालुक्यातील शेतीला उजनीचं पाणी मिळावं यासाठी ग्राउंडलेवला प्रत्यक्ष सक्रिय सहभाग घेऊन २५-३० लढा दिला.त्याचे फलीत तालुक्याला युतीच्या काळात आ.बबनदादा शिंदे यांनी मोठ्या हिकमतीने माढा तालुक्याच्या पदरात पाडून घेतले.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा