Breaking

बुधवार, २५ ऑगस्ट, २०२१

संभाजी ब्रिगेड व स्वाभिमानाच्या आंदोलनानंतर जेऊर परिसरातील वीजपुरवठा सुरळीत*



*संभाजी ब्रिगेड व स्वाभिमानाच्या आंदोलनानंतर जेऊर परिसरातील वीजपुरवठा सुरळीत*


*करमाळा तालुका प्रतिनिधी- अतुल वारे पाटील*

    करमाळा तालुक्यात सुरू असलेली वीज वितरण कंपनीची सक्तीची वीजबिल वसुली थांबवावी तसेच बंद असलेली वीज त्वरित सुरू करावी या मागणीसाठी संभाजी ब्रिगेड व स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आज जेऊर वीज वितरण कंपनी कार्यालयावर हलगी नाद आंदोलन करण्यात आले .
 या आंदोलनाच्या दणक्याने माघार घेत थांबवलेली  कृषी पंपांची वीज तात्काळ  सुरु करण्यात आली.
        यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सचिन जगताप ,टेंभुर्णी शहराध्यक्ष सचिन खुळे, मराठा सेवा संघ तालुकाध्यक्ष  अतुल वारे पाटील, संभाजी ब्रिगेड जिल्हा उपाध्यक्ष शंकर पोळ, तालुका अध्यक्ष अमित घोगरे, तालुका कार्याध्यक्ष राजेश ननवरे, तालुका सचिव गणेश डोके, तालुका संघटक दत्ता नलवडे ,स्वाभिमानी शेतकरी संघटना जिल्हा  अध्यक्ष रवींद्र गोडगे, तालुकाध्यक्ष सुदर्शन शेळके, युवा तालुकाध्यक्ष अमोल घुमरे, तालुका पक्षाध्यक्ष बापुराव फरतडे ,सुहास पोळ,
आदी उपस्थित होते.
    यावेळी बोलताना संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष सचिन जगताप म्हणाले की ,राज्यातील शेतकरी अभूतपूर्व संकटात असल्याने शेतकऱ्यांना मोफत वीज उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे.
सरकार शेतकऱ्यांचा बळी देऊन कारखानदार तसेच भांडवलदारांना पोसण्याचे काम करत आहे.शेतकऱ्यांना किमान सुविधा मोफत न मिळाल्यास संभाजी ब्रिगेड तसेच सर्व समविचारी संघटनांना सोबत घेऊन व्यापक जनआंदोलन उभा करणार असल्याचे प्रतिपादन त्यांनी यावेळी बोलताना केले.
   यावेळी सूर्यभान चोरगे, नानासाहेब नाईकनवरे, बलभीम धगाटे, रोहित तोरणे ,नानासाहेब पोळ ,भाग्यवंत पोळ, ज्ञानेश्वर पोळ ,विशाल पोळ, सोनू रोंगे ,किसन पोळ,नवनाथ पोळ ,साहेबराव पोळ ,ज्ञानेश्वर लगड ,बाळासाहेब तोरमल, आजिनाथ कळसाईत, महेश गोडसे, योगेश पोळ, आबासाहेब लबडे, नारायण देवकर, विष्णू शिरस्कर ,अमर गुंड ,माऊली गायकवाड ,शिवाजी कदम, रेवन सातपुते ,रामचंद्र कांबळे, सचिन कांबळे ,दादा वळेकर, हनुमंत वळेकर, नागनाथ पोळ ,शशिकांत पोळ, प्रदीप पोळ, संदीप पोळ आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा