Breaking

मंगळवार, ३१ ऑगस्ट, २०२१

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करा-संभाजी ब्रिगेड




अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करा-संभाजी ब्रिगेड



नांदेड जिल्हा प्रतिनिधी
बालाजी सिरसाट

नांदेड: अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करा संभाजी ब्रिगेडचे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन.

गेल्या दोन दिवसापासून नांदेड जिल्ह्यातील अनेक तालुक्यात प्रचंड अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाचे प्रचंड नुकसान झाले आहे.अवेळी पावसामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.प्रशासकीय यंत्रणेमार्फत अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांना शेतीचे पंचनामे करून त्वरित नुकसान भरपाई आर्थिक मदत द्यावी या मागणीचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे लोकसभा अध्यक्ष संकेत पाटील जिल्हाध्यक्ष सुभाष कोल्हे जिल्हा सचिव परमेश्वर पाटील,जिल्हा उपाध्यक्ष राम आनकाडे,जिल्हा उपाध्यक्ष कमलेश कदम , कृष्णा मोरे अविनाश शिंदे , मोहन शिंदे, सतिश धुमाळ, बालाजी देशमुख, दशरथ डरगे,प्रदिप गुबरे, अनिल राठोड,यांच्यासह संभाजी ब्रिगेडचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा