Breaking

मंगळवार, २४ ऑगस्ट, २०२१

वंचित बहुजन महिला आघाडी उस्मानाबाद च्या वतीने राजापूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथील २०० पूरग्रस्त कुटुंबाना अन्न धान्याचे किट वाटप.



वंचित बहुजन महिला आघाडी उस्मानाबाद च्या वतीने राजापूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथील २०० पूरग्रस्त कुटुंबाना अन्न धान्याचे किट वाटप.


उस्मानाबाद दि.(२४) येथील वंचित बहुजन महिला आघाडी उस्मानाबाद च्या वतीने राजापूर ता.शिरोळ जि.कोल्हापूर येथील २०० पूरग्रस्त कुटुंबाना अन्न धान्याचे किट वाटप करण्यात आले. सदर कीट मध्ये महिलां साठी नवीन साडी व घरगुती साहित्याचा समावेश होता. सदर किट साठी लागणारे साहित्य जिल्ह्यातील वंचित बहुजन महिला आघाडीच्या पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी साहित्याची जमवाजमव करून दिनांक २३ ऑगस्ट २०२१ रोजी टेम्पोने साहित्य राजापूर येथे नेहून गरजूंना त्याचे वाटप करण्यात आले. सदर साहित्याची जमवा जमाव करण्यासाठी जिल्ह्याच्या महिला जिल्हा अध्यक्षा अॅड.जीनात प्रधान यांच्या नेतृत्वाखाली उपाध्याक्षा ज्योती लोखंडे, वंदना गायकवाड,संघटक अनुराधा लोखंडे,सुजाता बनसोडे कोषाआध्यक्ष रुक्मिनिताई  बनसोडे, उस्मानाबाद तालुका अध्यक्षा मंगलताई आव्हाड, जिल्हा सदस्य सुमन पायाळ, खेड ता.लोहारा येथील जयश्री कांबळे,रेहाना मुल्ला,अश्विनी कांबळे व उस्मानाबद येथील सामाजिक कार्यकर्ते विजय बनसोडे आदींनी सहकार्य केले.
सदर किटचे वाटप हे कोल्हापूर वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा अध्यक्ष विलास कांबळे व त्यांचे कार्येकर्ते यांच्या सहकार्याने वाटप करण्यात आले. महिला जिल्हा अध्यक्षा अॅड.जीनात प्रधान,संघटक अनुराधा लोखंडे,सुजाता बनसोडे कोषाआध्यक्ष रुक्मिनिताई बनसोडे, उस्मानाबाद तालुका अध्यक्षा मंगलताई आव्हाड,यांच्या हस्ते करण्यात आले. कोल्हापूर वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष विलास कांबळे यांनी सर्वांचे आभार मानले.


प्रतिनिधी रूपेश डोलारे उस्मानाबाद

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा