Breaking

सोमवार, १५ नोव्हेंबर, २०२१

संभाजी ब्रिगेडन कंगनाला पाठवली भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याची पुस्तके



संभाजी ब्रिगेडन  कंगनाला पाठवली भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याची पुस्तकेे



सोलापूर : पद्मश्री पुरस्कार मिळालेली वादग्रस्त अभिनेत्री कंगना राणावत हिने देशद्रोही विधान करून भारताला स्वातंत्र्य कधी मिळाले हे कोणी सांगितले तर मी पद्मश्री पुरस्कार परत करेन, असे स्पष्टीकरण दिले होते.

याबाबत भारतीय स्वातंत्र्याबाबत  कंगनाला किती अज्ञान आहे. हे दिसून येते त्यामुळे आज संभाजी ब्रिगेड च्या वतीने कंगनाला भारतीय स्वातंत्र्याचा  अभ्यास व्हावा तिच्या ज्ञानामध्ये सुधारणा व्हावी, म्हणून तीला पोस्टाने रजिस्टर करून भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास व लढा अशी पुस्तके घरी पाठविण्यात आली.

कंगनाने भारताला 15 ऑगस्ट 1947 साली  स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’’, अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रनौतने एका कार्यक्रमात उधळली होती. यावरू मोठा वाद निर्माण झाला आहे. 

कंगनाने देशाचा अपमान केला असून, तिने माफी मागावी व पद्मश्री पुरस्कार परत करावा अशी मागणी संभाजी ब्रिगेड च्या वतीने करण्यात आली आहे. 

यावेळी संभाजी ब्रिगेड कार्याध्यक्ष अरविंद शेळके, उपाध्यक्ष सीताराम बाबर, संपर्कप्रमुख दत्ता जाधव, संघटक महेश हिरेमठ , सिद्धाराम सुतार, आली नायकोडी, इब्राहिम शेख, इलियास शेख आदी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा