*जिल्ह्यातील शेतकऱ्यांची वीज तोडणी बंद करावी,या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांचे जिल्हाधिकारी यांना निवेदन*
आज दिनांक,२२ नोव्हेंबर २०२१, रोजी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने,जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले, या निवेदनात असे नमूद करण्यात आले आहे की,उस्मानाबाद जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये वीज वसुली मोहीम चालू आहे व शेतकऱ्यांच्या लाईट तोडणी बंद आहे त्याचबरोबर शेतकरी प्रचंड अडचणी मध्ये आहे सध्या गावा-गावांमध्ये वीज तोडणी चालू आहे शेतकऱ्यांना त्रास होत आहे, एका बाजूला बघितले तर सोयाबीनचे भाव उतरले होते दुसऱ्या बाजूला आस्मानी सुलतानी संकट म्हणून निसर्ग राजा आमच्यावर कोपलेला आहे आता सुद्धा ज्वारी ची पेरणी करताना सुद्धा आमच्यावर संकट आलेले आहे, तरी यातून आम्हाला मोकळ करण्यासाठी वीज तोडणी ही बंद करावी,अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटना हातामध्ये रूमण घेऊन आंदोलन केल्याशिवाय शांत बसणार नाही,याची सर्व जबाबदारी शासन व प्रशासन यांच्यावर राहील,असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे, या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र इंगळे यांची स्वाक्षरी आहे,
प्राथमिक रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा