Breaking

शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर एक वर्षात ३४८ अपघात ८० लोकांचा बाली तर ४५७ जखमीमुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होणार कधी ? हे अपघात थांबणार कधी ? कोकण वासीयांना पडलेला प्रश्न


मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर एक वर्षात ३४८ अपघात ८० लोकांचा बाली तर ४५७ जखमी
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पूर्ण होणार कधी ? हे अपघात थांबणार कधी ? कोकण वासीयांना पडलेला प्रश्न

महाड : प्रतिनिधी
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर दर दिवस अपघाताची मालिका आज ही सुरू आहे.  नवीन होणाऱ्या महामार्गाच्या चौपदरी करना चे काम सुरू आहे .काही भागात काम पूर्ण झाले आहे तर काही भागात अर्धवट आहे तर काही भागात तांत्रिक अडचणी मुले अध्याप काम सुरू झालेले नाही  तरी आज ही अपघात थांबण्याचे नाव घेत नाही २०२१ या वर्षाची आकडेवाडी पहिली तर संपूर्ण मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर पलस्पे ते कोकणच्या तळा पर्यंत ३४८ अपघात झाले या मध्ये ४५७ प्रवाशी जखमी झाले तर ८० लोकांचा बळी गेला . या महामार्गाचे चौपदरी कारणाचे काम पूर्ण झाल्यावर तरी ही अपघात मालिका कमी होईल का असा प्रश्न सामान्य कोकण वासीयांना पडला आहे. गेली १० वर्षात या महामार्गाचे काम पूर्ण झालेले नाही या पुढे कधी होणार हा प्रश्न या ठिकाणी अध्याप कायम आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर अपघाताची मालिका आज ही कायम आहे. गेली वर्ष भराची आकडे वाडी पहिली तर मोठ्या प्रमाणात या महामार्गावर व अपघात झाले आहेत . पूर्वी असले ला अरुंद महामार्ग , वाहनांची वाढती संख्या , ठीक ठिकाणी असलेली वळणे आणि त्या पासून होणारे अपघात हे पाहता केंद्र सरकारने या महामार्गाच्या चौपदरी करणाला गेली १० वर्षा पूर्वी सुरवात केली या कामाचे २ टप्पे करत पहिला पालस्पे ते इंदापूर आणि दुसरा इंदापूर ते गोवा बॉर्डर पहिल्या टप्प्याच्या कामाला १० वर्ष पूर्ण झाली असली तरी आज ही ५० टक्के काम शिल्लक आहे आणि दुसऱ्या टप्प्याच्या कामाला ३ वर्ष झाली असली तरी याचे देखील काम ४० टक्के शिल्लक  आहे आज ही या मुंबई गोवा राष्ट्रीय  महामार्गाच्या अर्धवट कामा मुले कोकणात जाणाऱ्या वाहनांना अपघातांना सामोरे जावे लागत आहे. कोकणातील गणपती आणि होळी हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो त्या मुळे या महामार्गावर त्या सणा निमित्त वाहनांची मोठी गर्दी होते त्याच बरोबर दापोली ,मुरुड, अलिबाग ,या ठिकाणी पर्यटन  इस्थल असल्याने त्या ठिकाणी महाराष्ट्र तसेच अन्य राज्यातून पर्यटक येत असतात तर गणपती पुळे देवस्थान असल्याने आणि छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला रायगड किल्ला आणि डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर यांची क्रांती भूमी असलेला महाड शहर  देखील कोकणात असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येणाऱ्या पर्यटकांमुळे या महामार्गावर नेहमी वाहनांची संख्या जास्त प्रमाणात असते त्या मुळे या महामार्गावर अपघात मोठ्या प्रमाणात होत असतात . या  महामार्गाचे काम पूर्ण झाल्यावर अपघात कमी होतील असे समजले जाते मात्र या महामार्गावर दुसऱ्या  टप्य्याच्या काही ठिकाणी काम पूर्ण झाले आसले तरी आज ही अपघात थांबले ले दिसत नाही.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाची हद्दा पनवेल पलस्पे ते गोवा बॉर्डर पर्यंत जवळ पास ५५० किलोमीटर अंतर एवढी आहे या महामार्गावर पलस्पे , वाकण , महाड , कशेडी , चिपळूण , हातखंबा आणि कसाल अशे  ७ महामार्ग वाहतूक शाखा पोलीस केंद्र आहेत या सर्व केंद्राकडून २०२१ ची अपघाताची मिळालेल्या अकडेवाडी प्रमाणे या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर ५५० किलोमीटर अंतरा मध्ये  एक वर्षाच्या कालावधीत ३४८  अपघात झाले या मध्ये ८० लोकांचे बळी गेले तर ४५७ लोक जखमी झाली . २०२१ मध्ये झालेल्या अपघाताचा पूर्ण पणे अभ्यास केला तर हे सर्व झालेले अपघात नवीन होणाऱ्या महामार्गाच्या चौपद्रीच्या कामामुळे आहेत कारण होणारे अर्धवट काम , अनेक ठिकाणी पडलेले खड्डे तर काही ठिकाणी जोड रस्त्याला देण्यात आलेली वळणे आणि काही वळणाच्या ठिकाणी पडलेले माती आणि खडीचे डिगारे गेली दाहवर्षात हे महामार्गाचे काम  पूर्ण झाले असते तर या अपघात मध्ये बराच काही फरक पडला असता परंतु मागच्या दोन तीन वर्षांच्या  अपघाताची आकडे वाडी पाहिली तर २०२१  च्या आकडे वाडी मध्ये मोठा काही  फरक पडले ला दिसून येत नाही मात्र हा मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग कधी पूर्ण होणार आणि हे अपघात कधी थांबतील हा या ठिकाणी मोठा प्रश्न कोकण वासीयांना पडला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा