Breaking

सोमवार, १० जानेवारी, २०२२

भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी पत्रकारानी लिखान करावे : माजी मंत्री मधुकरराव चव्हाण



भारताची लोकशाही बळकट करण्यासाठी व शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी पत्रकारानी लिखान करावे : माजी मंत्री मधुकरराव चव्हाण


नळदुर्ग 
अजित चव्हाण

पत्रकार लोकशाही चा चोथा स्तंभ असुन त्यांनी 
शेतकऱ्यां च्या सम्रध्दी साठी पत्रकारिता करावी असे प्रतिपादन माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केले पुढे बोलताना आपल्या लेखणीतून लोकशाही बळकट करावी त्यांच बरोबर सध्या संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या व्यवस्था शासन दरबारी माडावी.समाजातील तळागाळातील नागरीकांच्या न्यायहक्का साठी आपल्या लेखणी चा वापर करावा असे ते जय मल्हार पत्रकार संघाच्या पत्रकार सन्मान कार्यक्रम प्रसंगी बोलताना शेवटी ते म्हणाले.
तुळजापूर तालुक्यातील अणदुर येथिल जय मल्हार पत्रकार संघाच्या वतीने   ग्रामीण व शहरी पत्रकारांचा आदर्श पत्रकारीता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले व दिनदर्शिका चे प्रकाशन करण्यात आले. या वेळी प्रथमता महाराष्ट्रातल्या आनाथाना मायेची सावली बनून राहीली ती माता सिंधुमाय सपकाळ याना भावपूर्ण आदरांजली पर श्रद्धांजली वाहण्यात आली . जय मल्हार पत्रकार संघाचे 2022  दिनदर्शिका प्रकाशन सोहळा व इटकळ,खानापूर, चिवरी,अणदुर, नळदुर्ग, वागदरी,खुदावाडी, जळकोटे येथील पत्रकार विलास येडगे, नळदुर्ग शहर पत्रकार संघटनेचे अध्यक्ष सुहास येडगे दादासाहेब बनसोडे श्रीनिवास भोसले , तानाजी जाधव , यांच्या सह परिसरातील ४२ पत्रकार बांधवांचा महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांच्या हस्ते तर सरपंच रामचंद्र आलुरे ,श्री श्री रविशंकर शाळेचे संस्थापक अध्यक्ष जितेंद्र कानडे , शिवसेनेचे नेते बाळकृष्ण घोडके ,  सामाजिक कार्यकर्ते भगिरथ कुलकर्णी , जेष्ठ पत्रकार अजय अणदुरकर यांच्या प्रमुख उपस्थित होते. ग्रामीण व शहरी पत्रकारांचा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दर्पकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले .  जय मल्हार पत्रकार संघ आणदूर यांच्यावतीने वर्षभर अनेक समाजोपयोगी कार्यक्रम राबविले  जातात . तर  कोरोनास हद्दपार करण्यासाठी कलापथकाच्या माध्यमातून  पत्रकार  संघाने गाव शहर वाड्या वस्तीत जाऊन प्रबोधन केली आहे . आगामी काळात येणा-या पिंगळा या मराठी चित्रपटात काम करण्यासाठी आणदुर येथील पत्रकार दयानंद काळुंके यांची निवड झाल्याबद्दल पत्रकार काळुंके यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मान देखील करण्यात आला . दर्पण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जय मल्हार पत्रकार संघातील सर्व पत्रकारांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा