**निश्चय बुद्धीमुळे जीवनात विजय प्राप्त होतो** अनिता बहेनजी
बेंबळे ।प्रतिनिधी। फोटो
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालय टेंभुर्णी शाखेच्या वतीने अकोले बुद्रुक येथे राजयोग-भट्टी कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना टेंभुर्णी केंद्राच्या प्रमुख संचालिका ब्रह्माकुमारी अनिता बहेनजी म्हणाल्या की प्रत्येक मनुष्यप्राणी जीवन काल व्यतीत करताना त्याला अध्यात्मिक ज्ञानाची नितांत आवश्यकता असते व परमात्म्याचे ज्ञान आत्मसात करण्यासाठी राजयोगाचे शिक्षण मिळवणे आवश्यक व महत्त्वाचे आहे. प्रत्येक व्यक्तीचे भाग्य भगवान शिव परमात्मा लिहीत असतो परंतु मनुष्याने जीवन मार्ग व्यतीत करताना व्यर्थ विचार करू नयेत, नेहमी सकारात्मक भूमिका ठेवावी ,दुर्गुण, दुर्बुद्धी, दुराचार ,व्यसन यापासून नेहमी अलिप्त रहावे,सदैव संघटनात्मक कार्य असावे, परमात्मा प्राप्तीसाठी बुद्धीद्वारे राजयोगाची शक्ती वाढवून सत्य वस्तुनिष्ठ कार्यासाठी निश्चय बुद्धी प्रामाणिक व खंबीर ठेवल्यास कार्य सफल होऊन विजय निश्चित प्राप्त होतो असे उत्कृष्ट मार्गदर्शन अनिता बेहेनजी यांनी केले.
या कार्यक्रमास हेमा पावले,पूजा बेहेन, सुकन्या पेनुरकर, सुरेश पेनुरकर ,अंकिता पेनुरकर, सुनंदा ताबे, कमल चव्हाण ,राणी खळदकर, शिवगंगा पेनुरकर, भाऊसाहेब कुलकर्णी ,सुभाष चव्हाण ,विलास चव्हाण, निवृत्ती कदम, वैजयंती कुलकर्णी ,सुलभा कुलकर्णी, भारती भोसले, मुकुंद रामदासी ,अंकिता पेनुरकर, खळदकर, भरगंडे तसेच टेंभुर्णी, बेंबळे ,अकोले बुद्रुक येथील ब्रह्मकुमारी गीता पाठशाळेतील अनेक मान्यवर आवर्जून उपस्थित होते. याप्रसंगी वनभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुरेश पेनुरकर व त्यांच्या परिवाराने विशेष परिश्रम घेतले .
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा