Breaking

शनिवार, ३१ मे, २०२५

माढा-करमाळा तालुक्यात मे मध्येच झाला चारच दिवसांत तलाव ओवरफ्लो.....* *सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण जाधव सरांच्या शेतात उन्हाळी पावसाची अशीही किमया....


*माढा-करमाळा तालुक्यात मे मध्येच झाला चारच दिवसांत तलाव ओवरफ्लो.....*


   *सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण जाधव सरांच्या शेतात उन्हाळी पावसाची अशीही किमया....*

कुर्डुवाडी, अरुण कोरे प्रतिनिधी.
         मौजे चौभेपिंपरी (ता.माढा-करमाळा बाउंड्री) येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक अरुण जाधव सर यांनी दोन एकरात सुमारे चाळीस फूट खोल असलेले त्यामध्ये तीस फूट खोल विहीर असलेले शेततळे-तलाव पूर्वीच घेतलेले होते.
    गतवर्षी पर्यत अख्ख्या पावसाळ्यातही हा तलाव केव्हा भरला नव्हता.यंदा मात्र ऐन उन्हाळ्यात अवघ्या चारच दिवसांत हा तलाव पूर्ण भरून ओव्हर फ्लो होऊन वहात आहे.अशी ही उन्हाळी पावसाची किमया.पंचक्रोशीतील शेतकरी पहाण्यासाठी येत असून आश्चर्यही व्यक्त करीत आहेत.
     संपूर्ण आयुष्य विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत घालवलेल्या अरुण जाधव सरांनी आर्थिक संपन्नता व तीन मुली डॉक्टर असतानाही उर्वरित आयुष्य काळ्या मातीची सेवा करण्याचा वसा घेतलेला आहे.ते स्वतः शेतीत रोज जातात.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा