टेंभुर्णीत अण्णाभाऊ साठे यांना मातंग एकता आदोलनचे वातीने अभिवादन
टेंभर्णी ! प्रतिनिधी
'संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्या'त करोडो मराठी मनांमध्ये अस्मितेचे स्फुल्लिंग चेतविणारे तसेच शोषित-पीडित- वंचितांच्या व्यथा वेदना आपल्या साहित्यातून अभिव्यक्त करुन उपेक्षित बहुजनांना नायकत्व बहाल करणारे विश्वविख्यात साहित्यिक साहित्यसम्राट अण्णाभाऊ यांचे स्मृतीदिनानिमित्त मातंग एकता आंदोलन सोलापूर जिल्हा यांचे वातीने शनिवार दि.१८ रोजी टेंभुर्णीतील अण्णाभाऊंच्या अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
अण्णाभाऊंच्या स्मृतीदिनानिमित्त वंचित बहुजन आघाडी,भाजपा युवा मोर्चा,टायगर ग्रुप यासह विविध संघटनांचे वतीने अभिवादन करण्यात आले.यावेळी वडार पँथरचे महाराष्ट्र कार्याध्यक्ष राजकुमार धोञे,सोलापूर काँग्रेसचे जिल्हासरचिटणीस व मातंग एकता आंदोलनचे जिल्हाध्यक्ष रामभाऊ वाघमारे,आरपीआयचे जिल्हा संघटक परमेश्वर शहराध्यक्ष रमेश लोंढे,वंचित आघाडीचे विशाल नवगीरे,राहुल चव्हाण,दादा मिसाळ,भाजपा युवा मोर्चाचे शहराध्यक्ष विजय कोकाटे,टायगर ग्रुपचे लखन माने,मातंग एकता आंदोलनचे राहुल जगताप,सतिश जगताप,संजय जगताप,रणजित जगताप,मिलिंद जगताप,संतोष धोञे,शोभाताई जगताप आदिजण उपस्थित होते.
टेंभुर्णी ग्रामपंचायतीच्या वतीनेही अण्णाभाऊंना अभिवादन
अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी निमित्त ग्रामपंचायत कार्यालयासमोरील अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास टेंभुर्णी ग्रामपंचायत च्या वतीने विनम्र अभिवादन करताना टेंभुर्णी सरपंच प्रमोद कुटे, उपसरपंच धनंजय गोंदील, सामाजिक कार्यकर्ते गोरख देशमुख युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष सोमनाथ (काका) कदम,ग्रामपंचायत सदस्य जयवंत पोळ, रघुनाथ बनसोडे सोनाई दूध संचालक व ग्रामपंचायत सदस्य गणेश (बापू) केचे, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ साळुंखे, शैलेश ओहोळ व राजाभाऊ बनसोडे, नितीन आखाडे,विक्रम आस्वरे,दशरत कसबे आदी उपस्तीत होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा