.अनिल उमाजी गुंजकर यांना राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरूगौरव शिक्षकरत्न पुरस्कार जाहीर...
नांदेड प्रतिनिधी
बालाजी सिरसाट
दि. 24 नांदेड किनवट तालुक्यासारख्या आदिवासी/अतिदुर्गम क्षेत्रात गेल्या 23 वर्षांपासून शिक्षणाच्या पवित्र अग्निहोत्रात सर्वोत्कृष्ट कार्य केल्याबद्दल मा.श्री अनिल गुंजकर तालुकाध्यक्ष अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघ किनवट व सध्या अतिदुर्गम आशा जि.प.प्रा.शाळा वसंतवाडी तालुका किनवट या ठिकाणी कार्यरत असलेल्या तंत्रस्नेही गुरुजीना मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली आहे.
मा.श्री अनिल गुंजकर गुरुजी सण 1997 पासून किनवट तालुक्यातील आदिवासी/अतिदुर्गम क्षेत्रात कार्यरत आहेत त्याच्या शैक्षणिक कारकिर्दीचा फार मोठा कालखंड हा या क्षेत्रातील आदिवासी वाड्या/पाड्याच्या शाळेवर गेला आहे.
सुरुवातीलाच जि.प.प्रा.शाळा लोणी येथे अध्यापणासोबतच विध्यार्थ्याच्या कलागुणांचा विकास व्हावा म्हणून सहली,सांस्कृतिक कार्यक्रम,क्रीडास्पर्धाचे आयोजनावर भर दिला.
शैक्षणिक दृष्ट्या मागास व शिक्षणाविषयी उदासीन आशा लोकांना शिक्षणाचे महत्व समजावून सांगून त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणून सामाजिक हित साधण्याचे फार मोठे कार्य ते अनेक वर्षांपासून करत आहेत.
जि.प.प्रा.शाळा खेरडा या ठिकाणी असताना त्यांनी नवोदय विद्यालय,शिष्यवृत्ती परीक्षात विध्यार्थ्याना उत्तीर्ण करून शैक्षणिक विकास साधला.प्रसंगी रात्रीच्या वेळी लोकांच्या सवडीच्या वेळेनुसार समुपदेशन वर्ग घेऊन पाल्य आणि पालक यांना शिक्षणाचे महत्व आणि विविध शैक्षणिक योजना समजावून सांगितल्या.शाळांना भौतिक सुविधा पदरचा पैसा खर्च करून उपलब्ध करून दिल्या.
केंद्रीय शाळा घोटी ता.किनवट या ठिकाणी रुजू होताच अवघ्या सहा महिन्यात शाळा संपूर्ण ज्ञानरचनावादी रंगरंगोटी करून ग्रा.पं.घोटी च्या सहकार्याने शाळा DIGITAL केली.
नुसती शाळा DIGITAL करून न थांबता त्यातून प्रत्यक्ष अध्यापणाला सुरवात केली या साठी DIGITAL आभ्यासक्रम उपलब्ध करून देऊन विद्यार्थ्याचा सार्वांगीन विकास साधण्याचा प्रयत्न केला.
21 जून जागतिक योगदीन,विविध जयंत्या पुण्यतिथ्याचे आयोजन केले.सांस्कृतिक कार्यक्रम,सहली,क्रीडा स्पर्धा,आंदनगरी या सारख्या आयोजनातून विध्यार्थ्याना शिक्षणासोबत इतर उपक्रमात सामावून घेऊन सामाजिक मूल्यांचा विकास साधण्याचा प्रयत्न केला.
प्रत्येक केंद्रीय शाळेवर संगणक संच हे जि.प.ने उपलब्ध करून दिले आहेत पण बहुतांश शाळेवर ते धूळखात पडलेले आहेत.हीच अवस्था पृस्तूत केंद्रीय शाळेची होती त्या संघनकाना पुनरजीवीत करून विध्यार्थ्याना प्रत्यक्ष हाताळण्यासाठी उपलब्ध करून दिले.
तत्कालीन उपविभागीय अधिकारी मा.भारुड साहेब यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्य आयोजित सृजनात्मक कार्यक्रमात गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली व नेत्रत्वात शाळेतील तीन विध्यायथ्याना तालुकास्तरावर गौरवण्यात आले.
शालेय स्वच्छतेअंतर्गत स्वच्छतासंकुलाचे बांधकाम रेकॉर्ड तीन महिन्यात करून कुठलेही शासकीय काम वेळेआधी सुद्धा पूर्ण होऊ शकते त्या साठी इच्छाशक्ती लागते हे त्यांनी यातून दाखवून दिले
सध्याच्या कोरोना काळात प्रत्यक्ष अध्यापन शक्य नाही तेंव्हा google meet, google classroom च्या माध्यमातून work from home साठी त्यांनी आपल्या blog व युट्युब च्या माध्यमातून vdo द्वारे हजारो शिक्षकांना मार्गदर्शन करत आहेत.
कोरोना सदृश्य परिस्थितीत 1 मे ला online निकाल कसा लावावा याचे सुद्धा त्यांनी मार्गदर्शन केले आहे व विध्यार्थ्याना घरबसल्या आपली गुणपत्रिका डाऊनलोड करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली.
कोरोना काळात जेंव्हा सर्वच ठिकाणी work from home चालू आहे तेंव्हा आपल्या वर्गातील विध्यार्थ्याना संबंधित विषयाची पाठयपुस्तके 3D effect सह उपलब्ध करून दिलीत म्हणजे त्यांना पाठयपुस्तके वापरण्यात वाचण्यात गोडी निर्माण होईल.
केवळ विध्यार्थ्याना विद्यादानाच नाही तर शिक्षकांच्या समस्या प्रशासन दारी मांडून शिक्षकांचे अनेक प्रश्न संघटनेच्या माध्यमातून सोडवण्याचा प्रयत्न करत असतात.
किनवट सारख्या अतिदुर्गम/आदिवासी तालुक्यातीच्या निबिड जंगलात शासन/प्रशासनाच्या दृष्टीतून हरवलेल्या अशा हरहुन्नरी,आदिवासी विध्यार्थाच्या शिक्षणाची तळमळ आसलेला,आधुनिक शिक्षणाची जाण असलेला व भविष्यात शाररिक मानसिक दृष्टया व तंत्रज्ञानी पिढी घडवण्यासाठी रात्रंदिवस झटणाऱ्या या आधुनिक द्रोणाचार्याला मनुष्यबळ विकास लोकसेवा अकादमी तर्फे राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक गुरुगौरव शिक्षकरत्न पुरस्कार 2020, दि.3 सप्टेंबर 2020 ला देऊन गौरविण्यात येणार आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा