Breaking

गुरुवार, २४ सप्टेंबर, २०२०

शिवाजीबाप्पू हे आदर्श नेतृत्वाचा दीपस्तंभ -महसूलमंत्री मा.बाळासाहेब थोरातश्रीगोंदा *AJ 24 Taas News Maharashtra


शिवाजीबाप्पू हे आदर्श नेतृत्वाचा दीपस्तंभ -महसूलमंत्री मा.बाळासाहेब थोरात

श्रीगोंदा प्रतिनिधीबाराते राजेश मधुकर
*AJ 24 Taas News Maharashtra
मोबाईल- ९४२२२२२७६५


       महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे दिवंगत अध्यक्ष कै.शिवाजीराव नागवडे तथा बापू यांच्या द्वितीय पुण्यस्मरनिमित्त महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण व ५० बेडच्या कोविड सेंटरचे उदघाटन करण्यात आले. तसेच ग्रामीण रुग्णालयात १० ऑक्सिजन बेडकरीता पुरवठा यंत्रणा व २ बायटॅफ व्हेंटिलेटर लोकार्पण सोहळा पार पडला. श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाच्या प्रांगणात हा कार्यक्रम पार पडला. श्रीगोंदा येथे प्रथमच ऑक्सिजन पुरवठा बेड व व्हेंटिलेटर उपलब्ध झाल्या आहेत.सर्वसामान्याना त्याचा उपयोग होणार आहे.

       बापूंच्या द्वितीय पुण्यस्मरयानिमित्त श्रीगोदा येथील जनतेसाठी कोविड सेंटर अर्पण करण्यात आले.बापूंनी त्यांचे सर्व आयुष्य हे कष्टकरी,शोषित,वंचितांसाठी वाहून घेतले होते. त्यांच्या त्यागातूनच आज येथील शेतकरी,वंचित बहुजनवर्ग सुख उपभोगत आहे.सहकारी कारखाना, सहकारी दूध संघ उभारून शेकऱ्यांना मालक बनवले होते. "विना सहकार नही उद्धार" या उक्तीचा प्रत्यय बापूंनी सर्वसामान्यांमध्ये रुजवला होता. श्री छत्रपती शिवाजी संस्थेच्या स्थापनेतून गरीब विद्यार्थ्यांना शिक्षण उपलब्ध करून दिले.बापूंची परोपकार भावना, त्यांची तळमळ ही सर्वानी अनुभवली आहे. पराकोटीचे चरित्र जपणाऱ्या बापूच्या स्वभावात कठोरपणा होता. परंतु तरीही आपलेपणात दडलेली वात्सल्यभावना समोरचा जाणत होता. सर्वसामान्याबद्दलची अपार करुणा बापूंची ताकत होती. याच सर्वसामान्य जनतेला बापूंनी आपले जीवन अर्पण केले. जनतेवर आज करोना महामारीने घावा घातलेला आहे. बापूंच्या पावलावर चालत राजेंद्रदादा नागवडे यांनी या संकटात कोविड सेंटर जनतेला अर्पण केले आहे.बापूंचा वसा आणि वारसा ते समर्थपणे पुढे घेऊन जात आहेत. 
        या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी महसूलमंत्री मा.बाळासाहेब थोरात हे होते. त्यांनी अतिथि भाषणात बापूंचे योगदान अधोरेखित केले.तसेच बापूंच्या आदर्श कारखाना तत्वज्ञानाच्या स्मृती जागृत केल्या. सहकारी कारखानदारी कशी चालवावी हे बाप्पूनी महाराष्ट्राला दाखवून दिले. बापूंना राज्यातील सहकारी चळवळीत महत्वाचे स्थान आहे. बापूंनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कठीण काळात ताकद दिल्याचे त्यांनी प्रतिपादित केले. जनसामान्यांनी बापूंचे विचार पुढे घेऊन जावे असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.
      अध्यक्षस्थान मा.राजेंद्रदादा नागवडे यांनी भूषविले होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात बापूंच्या संघर्षमय कार्याचा संक्षिप्त आढावा घेतला. सहकारातील बापूंचे विचार महाराष्ट्रासाठी महत्वाचे होते. बापूंच्या सामाजिक कार्याची प्रेरणा व वसा पुढे चालू ठेवत आहोत. बापूंचे विचार पुढील पिढीला देण्यासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच श्री छत्रपती शिवाजी शिक्षण संस्थेमार्फत १५० बेडचे कोविड सेंटर बनवले जाणार आहे याची ही माहिती दिली. 
       या कार्यक्रमासाठी आमदार श्री.बबनराव पाचपुते ( मा.मंत्री),सौ.अनुराधा नागवडे (मा.सभापती), बाळासाहेब साळुंखे (जिल्हा काँग्रेस अध्यक्ष), मा.आ.राहुलदादा जगताप, श्री.बाबासाहेब भोस (मा.अध्यक्ष जि. प), सौ.शुभांगीताई पोटे (नगराध्यक्षा), श्री.भगवानराव पाचपुते (उपाध्यक्ष ना.का), श्री.बाळासाहेब गिरमकर (मा.सभापती जि.प), श्री.घनश्याम शेलार (संचालक सा.का), श्री.दत्तात्रय पानसरे (संचालक जि.प), श्री.दिपकशेठ नागवडे, श्री.दीपक भोसले, श्री.सोपानराव थिटे, श्री.केशवभाऊ मगर (व्हाईस चेअरमन), श्री.बाळासाहेब नहाटा (संचालक म.क), श्री.संजय जामदार (सभापती मा.क), श्री.नितीन खामकर (तालुका आरोग्य अधिकारी),
श्री.बापूराव नागवडे, श्री.विलास जाधव, प्राचार्य डॉ.एकनाथ खांदवे व सर्व प्राध्यापक,विद्यमान संचालक नागवडे कारखाना हे उपस्थित होते.
प्रास्ताविक काँग्रेस तालुका अध्यक्ष मा.दीपक भोसले यांनी केले.तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.धर्मनाथ काकडे यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा