शिवधर्म फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या लढ्याला अखेर यश
साबळे वाघिरे आणि कंपनीने पुण्यात पत्रकार परिषद घेऊन दिली नाव हटवणार असल्याची माहिती
पुरंदरच्या तहसीलदार रुपाली सरनोबत यांना निवेदन देताना अध्यक्ष दिपक काटे व शिवधर्म फाउंडेशनचे कार्यकर्ते.
सविस्तर घटनाक्रम खालील प्रमाणे
संभाजी विडी उद्योगावर गुन्हा दाखल: शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दिपक अाण्णा काटे नाव बदलायच्या भुमिकेवर ठाम राहीलेमुळे झाला गुन्हा दाखल?अखेर साबळे वाघिरे कंपनीने नाव हटविण्याची पुण्यात केली घोषणा.
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार
AJ 24 Tass News Maharashtra
इंदापूर दि.10, छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर करून विडीसारख्या व्यसनाच्या पदार्थांना नाव देण्यावरून वाद निर्माण झाला होता. संबंधित विडी उद्योगाने संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर त्वरित थांबवावा अशी मागणी जोर धरू लागली . विडी हा व्यसनाचा पदार्थ आहे. त्यामुळे त्याला दिलेलं छत्रपती संभाजी महाराजांचे नाव काढून टाका या मागणीसाठी महाराष्ट्र शिवधर्म फाउंडेशन या संघटनेने आंदोलन पुकारले . या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दिपक अाण्णा काटे व संघटनेचे पदाधिकारी पुरंदर किल्याच्या पायथ्याला उपोषणाला बसले होते. पाच दिवसानंतर संबंधित विडी कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल केल्यानंतर या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी उपोषण सोडले .
शिवधर्म फाउंडेशन चे अध्यक्ष दिपक अाण्णा काटे यांनी काल सासवड पोलीस ठाण्यात साबळे वाघिरे उद्योग समुहाच्या चेअरमन आणि संचालक मंडळाविरुद्ध तक्रार दाखल केली .
याबाबत सविस्तर माहिती अशी की शिवधर्म फाउंडेशन चे दिपक काटे, मच्छिन्द्र टिंगरे, सुनील पालवे, सागर पोमण, रवी पडवळ, दिनेश ढगे हे कार्यकर्ते पुरंदर किल्याच्या पायथ्याला ४ सप्टेंबर पासून उपोषणाला बसले होते. ८ सप्टेंबर रोजी पहाटे एक वाजता सासवड पोलिसांनी या उपोषण कर्त्यांवर गुन्हा दाखल करून अटक केली मात्र तरीही उपोषण सोडणार नाही अशी दिपक काटे व कार्यकर्त्यांनी ठाम भुमीका घेतली.
त्यानंतर त्यांना जेजुरी येथील शासकीय रुग्णालयात उपचाराकरिता दाखल करण्यात आले. या दरम्यान तहसीलदार रुपाली सरनोबत, पीआय हाके साहेब यांनी कोविड चा प्रादुर्भाव लक्षात घेऊन उपोषण सोडण्याची मागणी केली. यावेळी उपोषण कर्त्यांनी संभाजी विडी उत्पादन करणाऱ्या कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली.
यावेळी उपोषण कर्त्यांनी संभाजी विडी उत्पादन करणार्या कंपनीच्या मालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. त्यानुसार कंपनीचे मालक अाणि संचालक मंडळ यांच्यावर छञपती संभाजी महाराज यांची बदनामी व अपमान करत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात अाला अाहे.
महापुरषाच्या नावाचा गैरवापर करणे अक्षम्य चुक अाहे. लोकभावनेचा विचार करुन छञपती संभाजी महाराजांच्या नावाचा गैरवापर तातडीने थांबवावा.
यानंतर शिवधर्म फाउंडेशन मार्फत सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन आमदार अमोल मेटकरी यांनी विधान परिषदेत मुद्दा मांडला.
अखेर शिवधर्म फाउंडेशन महाराजांचे नाव न हटवल्यास आंदोलन अधिक तीव्र करुन राज्यात आम्ही १५ सप्टेंबर पासुन साखळी आंदोलन करणार आहे असे सांगून साबळे वाघिरे कंपनीने नाव बदलल्या शिवाय त्यांची एकही गाडी महाराष्ट्रात फिरु देणार नाही असा पवित्रा घेतला.अखेर साबळे वाघिरे कंपनीने पुण्यात पत्रकार परिषदेत नाव बदलणार असल्याची माहिती दिली.त्यामुळे महाराष्ट्रातून सर्व शिवप्रेमींनी दिपक आण्णा काटे व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.आपल्या महाराजांचा रोज सुरू होणारा अवमान आता थांबणार म्हणून सर्व शिवप्रेमींमध्ये उत्साहाचे व अानंदाचे वातावरण आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा