*भावी अभियंत्यांनी ज्ञानाच्या व कौशल्यांच्या आधारे समाजास योगदान द्यावे- अनंत चिंचोलकर*
*स्वेरीत ‘अभियंता दिन’ संपन्न*
------------------------------------------
*पंढरपूर प्रतिनिधी /संतोष हालकुडे*
*AJ24Taas News maharashtra*
------------------------------------------
पंढरपूर प्रतिनिधी दि. ‘समाजाच्या जडणघडणीत आताच्या अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्यांचे म्हणजेच भावी अभियंत्यांचे योगदान मोलाचे असणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या कौशल्यांचा जास्तीत जास्त विकास करावा. व्यावसायिक क्षेत्रात भरीव कामगिरी करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपले संभाषण कौशल्य, व्यवस्थापन कौशल्य तसेच शारीरिक व मानसिक क्षमतांचा विकास केला पाहिजे. आपल्या ज्ञानाच्या व क्षमतांच्या आधारे आपण एखाद्या संस्थेस, विभागास व शेवटी समाजास काय योगदान देऊ शकतो असा विचार विद्यार्थ्यांनी करणे गरजेचे आहे,’ असे प्रतिपादन कल्याणी टेक्नोफोर्ज, पुणेचे संचालक व मानव संसाधन विभागप्रमुख अनंत चिंचोलकर यांनी केले.
गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट, पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त अर्थात ‘अभियंता दिना’च्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून कल्याणी टेक्नोफोर्ज, पुणेचे संचालक व मानव संसाधन विभागप्रमुख अनंत चिंचोलकर हे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून विद्यार्थी व प्राध्यापकांना मार्गदर्शन करत होते. या प्रसंगी सन्माननीय अतिथी म्हणून स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेश कांबळे हे लाभलेले होते. प्रारंभी प्रवेशद्वाराजवळ डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेचे संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. स्वेरीची संपूर्ण माहिती देवून संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांनी संचालक अनंत चिंचोलकर यांचे स्वागत केले. यावेळी संस्थेचे संस्थापक विश्वस्त दादासाहेब रोंगे म्हणाले की,'ज्यावेळी अभियंत्यांसाठी काहीही तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते त्यावेळी सर विश्वेश्वरय्या यांनी जे कार्य केले ते निश्चितच तंत्रज्ञानाच्या विकासासाठी महत्वपूर्ण ठरले. अशा या अभियंत्याचे कार्य गौरवास्पद आहे. सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या हे डेव्हलपमेंट व इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये उत्तम संकल्पना मांडत असत. त्यामुळे जगाला प्लॅनिंग आणि आर्थिक धोरण मिळाले. त्यांच्या कार्यात नियोजन, उत्तम प्लॅनिंग आणि सोशल वर्क हे गुण दिसून येत होते म्हणून आपण समाजाचे देणं लागतो या विचाराने अभियंत्यांनी कार्य करणे आवश्यक आहे.’ प्रत्येक वर्षी 'अभियंता दिन' भव्य ओपन थिएटर मध्ये घेण्यात येतो परंतु कोरोना महामारीमुळे आज प्रथमच महाविद्यालयाच्या पोर्चमध्ये साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे अध्यक्ष एन.एस. कागदे, विश्वस्त एच.एम. बागल,विश्वस्त बी.डी.रोंगे, माजी अध्यक्ष व विश्वस्त धनंजय सालविठ्ठल, युवा विश्वस्त प्रा.सुरज रोंगे, डॉ.स्नेहा रोंगे, स्वेरीचे कॅम्पस इन्चार्ज प्रा.एम.एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य डॉ.एन.डी. मिसाळ, प्राचार्य डॉ.मिथुन मणियार, प्राचार्य प्रा. सतीश मांडवे यांच्यासह अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी आदी उपस्थित होते. या ऑनलाईन कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. यशपाल खेडकर यांनी तर आभार प्रदर्शन विद्यार्थी अधिष्ठाता डॉ. अभय उत्पात यांनी केले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा