Breaking

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०२०

करमाळा तालुक्यात पावसामुळे नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी* - *हाजी उस्मानशेठ तांबोळी* *


*करमाळा तालुक्यात पावसामुळे नुकसानग्रस्त  पिकांचे  पंचनामे न करता सरसकट नुकसान भरपाई द्यावी* - *हाजी उस्मानशेठ तांबोळी* 


*अतुल वारे पाटील-करमाळा*             
              करमाळा तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने ग्रामीण भागातील अनेक पिकांचे नुकसान झाले आहे. तसेच अतिवृष्टी मुळे ओढे नाले पाण्याने भरून वाहू लागलेने सदरचे पाणी शेतीत घुसल्याने  शेतीचे बांध फुटले, पर्यायी पाण्यामुळे शेतीतील माती वाहुन गेले तर पिकांचे नुकसान झाले आहे. तरी शासनाने ताबडतोब पिकांचे  व शेतीतील झालेल्या नुकसानाचे पंचनामे करण्यात वेळ न घालवता शेतकरी ना सरसकट नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पुणे शहर काँग्रेस  कमिटीचे चे शहर उपाध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी  जिल्हाधिकारी  सोलापूर यांचेकडे केली आहे .
           या निवेदनात म्हटले आहे की करमाळा तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे ओढे नाले व नदीला मोठया प्रमाणात पाणी आलेआहे .तर तालुक्यातील कुंभेज, मांगी ,वडशिवणे ,म्हसेवाडी, नेर्ले ,विट आदी छोटे मोठे तलाव तुडुंब भरलेआहेत. तर सीना नदी दुधडी भरून वाहत आहे.कोळगाव उजनी जलाशय 100% भरला आहे. परंतु  या पावसाने नुकत्याच पेरणी केलेल्या ज्वारी, कांदा, तुर या पिकांचे नुकसान केलेआहे . फळबागा. तरकारी भाजी - पाला, ऊस, केळी यांचेही नुकसान केले  आहे .तर अनेक गावात पावसामुळे शेतकऱ्यांची घरे सुध्दा पडली आहे. काल झालेल्या पावसामुळे तालुक्यातील पोथरे. आळजापुर. खडकी, कामोणे बिटरगाव श्री, मांगी, वडगाव ,रावगाव, पिंपळवाडी, मोरवड, पोंधवडी, रोशेवाडी तरटगाव, बाळेवाडी, निलज तसेच अनेक गावात पावसामुळे नुकसान झाले आहे. आता शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागणार आहे. तरी शासनाने त्यांना  दर्जेदार मोफत बियाणे द्यावे तसेच नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यात वेळ न घालवता  शेतकऱ्यां ना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पुणे शहर काँग्रेस कमिटीचे शहर उपाध्यक्ष हाजी उस्मानशेठ तांबोळी यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा