कर्मयोगीचे कार्यकारी संचालक बाजीराव सुतार यांनी प्रत्यक्ष ऊसतोडणीची रानात जाऊन केली पाहणी
इंदापूर प्रतिनिधी शिवाजी पवार
इंदापूर प्रतिनिधी AJ 24 Taas News Maharashtra
दि. २८ ऑक्टोबर रोजी – कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचा २०२०-२१ चा गाळप हंगाम सुरळीत चालू झालेला असून कारखान्याकडे ऊसतोडणी होवून येणा-या ऊसाची तोडणी व्यवस्थीत होणेसाठी व अतिवष्टीमुळे खराब झालेल्या रस्त्यांची कारखाना कार्यक्षेञातील मौजे सरडेवाडी येथे कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतारसो, मुख्य शेतकी अधिकारी श्री. एस.जी. कदम व सिव्हील इंजिनिअर श्री. एस.बी. शिंदे यांनी कारखान्याचे मा.संचालक श्री. वामनराव पंढरीनाथ सरडे यांचे प्रत्यक्ष प्लॉटवर जाऊन पाहणी केली.
यावेळी कार्यकारी संचालक श्री. बाजीराव सुतारसो यांनी कारखान्याचे ऊस उत्पादकांचे ऊस वजनाचे नुकसान होवू नये तसेच कारखान्याची रिकव्हरी वाढावी यासाठी ऊसतोडणी करणा-या मजुरांना ऊस तोड जमीनीलगत करावी, स्वच्छ व पाचटविरहित ऊस गळीतास आणावा, तसेच वाहन चालकाने फडातून तोडणी केलेला ऊस घेवून येताना रस्सीने घट बांधलेला आहे का याची पाहणी करावी. टेलरला मागील बाजूस कापडी रिफलेक्टरचा वापर करावा व विनाअपघात वाहन कारखाना साईटवरती हजर होईल याची दक्षता घ्यावी. ऊसाबरोबर कोणतेही फॉरेन मटेरियल येणार नाही याची दक्षता घ्यावी, कोरोना संदर्भात ऊसतोड मजूर, वाहतुक यंञणा या सर्वांनी काळजी घ्यावी अशा सुचना त्यांनी केल्या.
यावेळी मौजे सरडेवाडी येथील कारखान्याचे माजी संचालक श्री. वामनराव पंढरीनाथ सरडे व हिंगणगांव येथील इतर ऊस उत्पादक शेतकरी यांनी प्लॉटची पाहणी केलबद्दल व विशेष सुचना दिलेबद्दल कारखान्याच्या सर्व अधिकारीवर्गाचे आभार मानले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा