अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडून खरात कुटुंबियांचे सांत्वन.
कन्हेरगांव प्रतिनिधी /धनंजय मोरे
टेंभुर्णी शहरात पुराच्या पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या उध्दव बापू खरात ( वय 60 ) यांच्या कुटुंबियांचे वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी सहा वाजता भेट घेऊन सांत्वन केले.
गेल्या आठवड्यात बुधवारी दिवसभर झालेल्या तुफानी पावसाने ओढ्यात आलेल्या पुराच्या पाण्यात बुडून सिध्दार्थ नगरमधील उध्दव खरात यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी अॅड. प्रकाश आंबेडकर हे टेंभुर्णी मध्ये आले होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रदेश प्रवक्ते आनंद चंदनशिवे, कोषाध्यक्ष बबन शिंदे, जिल्हा महासचिव विशाल नवगिरे, शहर अध्यक्ष गणेश पुजारी, राहुल चव्हाण, रणजित गायकवाड, अविनाश लोंढे, जुगल खरात, गणेश खरात, राजू वाघमारे, विशाल मिसाळ, आण्णा वाघमारे, तात्या सरवदे आदी उपस्थित होते.
यावेळी अॅड. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, टेंभुर्णी शहरात शासकीय वैद्यकीय सेवा पुर्णवेळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा