Breaking

सोमवार, १९ ऑक्टोबर, २०२०

मनमानी करून उच्छाद मांडाल तर; गाठ आमच्याशी- पो नि. राजकुमार केंद्रे




मनमानी करून उच्छाद मांडाल तर; गाठ आमच्याशी- पो नि. राजकुमार केंद्रे 


AJ 24 Taas News Maharashtra
सज्जन शिंदे 
बेंबळे प्रतिनिधी
- बेंबळे येथे काही दिवसांपूर्वी दोन गटांमध्ये कीरकोळ कारणांवरून दोन वेळा तुफान हाणामारी झाली होती. यावेळी परस्पर विरोधी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे नोंदसुध्दा झाली होती. यामुळे बेंबळे गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर दि. १८ (रविवार) रोजी शांतता कमेटीची बैठक विमलेश्वर मंदीरात संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे हे होते.

या बैठकीदरम्यान पो नि केंद्रे हे मार्गदर्शन करताना म्हणाले भांडणे ही क्षणात होतात परंतु याचे परीणाम फार वाईट भोगावे लागतात. या भांडणांमध्ये कीत्येक पीड्या बरबाद होतात, भांडणांमुळे वेळ, पैसा तर वाया जातोच पण मोठ्या मानसिक त्रासाला सुध्दा सामोरे जावे लागते. प्रत्येक समस्येचे निराकरण भांडणातून होत नसते तर चर्चा व समोपचाराने समस्येचे निराकरण होते. यातून गुन्हे न घडता वाद मिटतात आणि पुढे होणाऱ्या अर्थिक व मानसिक हानी टाळून आयुष्यात शांततेचे वातावरण निर्माण होण्यास मदत होते. जर भांडण समोपचार व शांतेत न मिटवता पैशाच्या जोरावर मनमानी करून उच्छाद मांडल तर गाठ आमच्याशी आहे असा सज्जड दम ही भरला. या बैठकीदरम्यान पो नि. केंद्रे यांनी दोन्ही गटांचे हेवे-दावे ऐकून घेत उपस्थित नागरिकांना गावात शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी अवाहन केले. 

यावेळी बैठकीस टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे पोहेकॉ बाबर,लोंढे, बनसोडे, माने देशमुख तसेच शांतता कमेटीचे सदस्य प्रतिष्ठित नागरीक, पत्रकार, पोलीस पाटील यांच्यासह गावातील नागरीक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा