*पुणे पदवीधर मतदार संघात अरुण गणपती लाड जोशात तर भाजपचा उमेदवार गोत्यात...*
*भाजपच्या अंतर्गत कलहात संग्राम देशमुखांना क्रेन अॅग्रो व डोंगराईचा वेटोळा...*
*अपक्षांच्या मांदियाळीत श्रीमंत कोकाटेंना संभाजी ब्रिगेडच्या मनोज गायकवाडांनी खिंडीतच रोखले...*
*भाजपचा मतदार संघ हिसकावण्यास जिद्दीने सगळेच सरसावले...*
AJ 24 Taas News Maharashtra
* कुर्डूवाडी प्रतिनिधि /अरुण कोरे ..*
*पुणे पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीत ६२ उच्चांकी उमेदवार उभे राहिले असून पांच जिल्ह्याच्या कार्यक्षेत्राचा आढावा घेतला असता महाविकास आघाडीचे उमेदवार अरुण गणपती लाड यांनी आपल्या क्रियाशील रचनात्मक कार्याच्या योगदानावर चांगलीच आघाडी घेतली असून वीस वर्षांचा भाजपचा मतदार संघ हिसकावण्यास जिद्दीने सर्वजण आपापले योगदान देत असल्याचे अंतीम टप्प्यात स्पष्ट दिसून येत आहे.*
*गेली दोन दशके भाजपच्या ताब्यात असलेल्या पुणे मतदार संघात पदवीधरांचे कोणतेही प्रश्न न सुटता ते अधिकच जटील करण्यांत धन्यता मानणारे उमेदवारच लाभल्याचे पदवीधर मतदारांनी अनुभवले आहे.*
*त्यामुळे चालू निवडणुकीसाठी मतदारांनी नोंदणी करतानाच तब्बल ६२ उमेदवारांनी उच्चांकी उमेदवारी भरुन चांगलीच जागृती केली आहे.*
*कोल्हापूर,सांगली,सातारा, सोलापूर व पुणे जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या मतदार संघात भाजपचा गड सर करण्यासाठी महाविकास आघाडीच्या सर्वच घटकांनी चांगलीच कंबर कसली असल्याचे दिसून येते आहे.*
*महाविकास आघाडीचे कुंडलचे उमेदवार अरुण गणपती लाड यांनी क्रांतीअग्रणी कै. जी.डी.बापू लाड यांचा वारसा आपल्या कार्यकुशलतेवर जपत सांगली-कोल्हापूर जिल्ह्यात आपला वेगळाच ठसा उमटविला आहे.सर्वांचे हितगुज करीत हितसंबंध जोपासण्यात त्यांचा हातखंडा आहे तो सक्रिय कार्यानेच.*
*सहकार क्षेत्रात दिपस्तंभासारखे काम करतानाच रोजगाराभिमुख कार्यावर त्यांचा जोर असल्याचे दिसून येते.पदविधरांच्या प्रश्नांचे ते जाणकार असून सत्ता नसली तरी त्यांचे प्रश्र्न सोडविण्यास ते अग्रभागी असल्याचे त्यांच्या कार्यावरुनच दिसून येते.सहकार,समाजसेवा, महिलांचे सक्षमीकरण,व पर्यावरणाचे संवर्धन हेच माझे व्रत असल्याचे अरुण लाड दृढनिश्चयाने सांगतात.*
*त्यांच्या विरोधात ६१ उमेदवार जरी उभे राहिले असले तरी संग्राम देशमुखभाजप,रुपाली ठोंबरे-पाटील(मनसे), अमोल पवार (आ.आ.पार्टी),कपील कोळी (अ.भा.हिंदू महासभा), कृष्णात पुलुसकर(प्रबुध्द रि.पार्टी),मनोज गायकवाड (संभाजी ब्रिगेड पार्टी), मिलींद कांबळे (नेताजी काॅ.सेना),लक्ष्मण चव्हाण (प्रजासत्ताक भारत पक्ष),प्रा.शरद (जनता दल सेक्यू).सोमनाथ साळुंखे (वंचीत बहुजन आघाडी),हनिपा खान (इं.नॅ.मा.पा)असे पक्षीय १२ अधिकृत उमेदवार आहेत.*
*तर अपक्ष म्हणून तब्बल ५० उमेदवारांनी अर्ज भरून उच्चांक तर केला आहेच.पण भाजपच्या उमेदवारांस रोखण्यासाठी तर ही व्युव्ह रचना नाही ना? अशी उलट सुलट चर्चा राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.*
*अरुण लाड सांगली जिल्ह्यातील आहेत.तर भाजपचे संग्राम देशमुखही सांगली जिल्ह्यातीलच आहेत.देशमुखांविरुध्द सांगली जिल्ह्यात चांगलाच असंतोष खदखदत आहे.गेल्या दोन वर्षांपासून डोंगराई व क्रेन अॅग्रो कारखान्याची शेतकऱ्यांच्या कष्टाची ऊस बिले न दिल्याने शेतकऱ्यांनी आत्मदहनापर्यत हत्यार उपसल्याने व गेल्या दोन-तीन महिन्यांपासून हा प्रश्र्न ऐंरणीवर आल्याने भाजपचा उमेदवार किल्यातच म्हणण्यापेक्षा घरातच अडकून पडल्यात जमा आहे.तर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मेरिटच्या वल्गना पोकळच ठरल्याने त्यांचीही पळता भुई थोडी झाली असल्याचे स्पष्ट दिसून येते.*
*तर चार दिवसांपासून दादांची दादागिरी चंपारण्यातच गायब झाल्याने भाजपचा गडकिल्ल्यांला चांगलेच भगदाड पडलें आहे.*
*मनसेच्या अॅड.रुपाली पाटील-ठोंबरे याची उमेदवारी पुणे जिल्ह्यांतीलच असल्याने भाजपचे बुरुज ढासळत लाडांच्या पथ्यावरच पडल्याचे दिसून येत आहे.*
*बाकीचे नऊ पक्षीय उमेदवार आप आपली किती मतें खेचण्यात पारंगत राहतील यांवर ब-याच गोष्टी अवलंबून रहाणार आहेत.*
*रहाता राहीला अपक्ष ५० उमेदवारांच्या उमेदवारीच्या निवडणूकीचा.त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यात १३,सांगली ९,सातारा ९,कोल्हापूर ६,पुणे१३ असे उमेदवार उभे आहेत.*
*राष्ट्रवादीतून उमेदवारी न मिळाल्याने डॉ.श्रीमंत कोकाटे यांनी आपल्या भाषणांच्या भांडवलावर अपक्ष उमेदवारी घोषित केली खरी पण किल्ला सर करण्याच्या अगोदरच त्यांना संभाजी ब्रिगेडच्याच मनोज गायकवाडांनी खिंडीतच गाठल्याचे दिसून येते.मराठा सेवा संघ व संभाजी ब्रिगेड यांचा कुठल्याही अपक्ष उमेदवारास पाठिंबा नसल्याचेही व अपप्रचाराला बळी न पडण्याचे बालेकिल्ल्यातूनच गर्जना केल्याने कोकाटेंची मदार किल्ला सर करण्यावर किती हाही प्रश्न उभा ठाकला आहे.अरुण अण्णा लाड या नावाने पुणे जिल्ह्यातील अपक्ष उमेदवारानेही अर्ज दाखल केला आहे.*
*अपक्षांच्या ५० जणांच्या मांदियाळीत व्यक्तीगत पातळीवर कोण कोणाची किती मतें घेणार यांवर भाजपच बॅकफूटवर दिसून आल्याने अपक्षांच्या उमेदवारीही अरुण गणपती लाड यांच्याच पथ्यावर पडल्याचे दिसून येत आहे.*
*अरुण गणपती लाड यांच्यासाठी पाचही जिल्ह्यातील मातब्बरांनी लावलेली ताकदीने त्यांचें पारडे जड झाले म्हणण्यापेक्षा विजयी घोडदौड अंतिम टप्प्यात सुरूच असल्याचे म्हटले तर वावगे ठरू नये.प्रभावी व एकसंघ प्रचार यंत्रणा, पाचही जिल्ह्यातील मातब्बर शैक्षणिक संस्था बरोबरच लहान सहान शिक्षण समूहांचाही मनस्वी पाठींबा,सर्वच मित्रपक्षांचे भाजपला असणारा विरोध व एकजुटीने योगदान, कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार संख्या व तिथं असलेला भाजप विरुद्ध असंतोष,चारित्र्य संपन्न स्वच्छ कारभारामुळे पदवीधर मतदारांच्यात असणारा आदर यामुळे अरुण लाडांच्या मतपेटीत दिवसेंदिवस भरीस भरच पडत चालल्याचे दिसून येत आहे.*
*विशेष म्हणजे मतपत्रिकेत त्यांचें नांव प्रथम क्रमांकावरच असल्याने पसंती क्रमांत एक नंबरने मिळविणे कामी योगायोगाने त्यांना फायद्याचेच झाल्याचे दिसून येते.*
*भाजपाचे उमेदवार संग्राम देशमुख निवडीचे मेरीटचे पक्षीय उघड पडलेले पितळ,जिल्ह्या जिल्ह्यात भाजप अंतर्गत विधानसभा-लोकसभा निवडणुकीतील वचपा व खुन्नस,गत निवडणुकीपेक्षा अपुरी व विस्कळीत प्रचार यंत्रणा,अपक्षांनी व मित्र पक्षांनी सोडलेली साथ अन् केलेली गोची एकाकी भाजपला बॅकफुटवर घेऊन जाण्यास कारणीभूत ठरल्याचे दिसून येत आहे.*
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा