*महावितरणाच्या हलगर्जी पणा मूळे एकाच कुटूंबातील तिन भावांचा मृत्यू!*
******************************
*जालना जिल्ह्यातील घटना*
जालणा जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यातील पळसळेडा पिंपळे, येथे, बुधवार ,रात्रीच्यावेळी शेतीला पाणी देत असताना विजेचा शॉक लागल्याणे विहिरीत कोसळून एकाच शेतकरी कुंटूबातील सख्खे तिन भाऊ दगावल्याने तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. विजेचा शॉक लागून ज्ञानेश्वर आप्पासाहेब जाधव, वय २६ ,
रामेश्वर आप्पासाहेब जाधव ,वय २६ ,
सुनिल आप्पासाहेब जाधव.वय १८
या तिन सख्ख्यां भावांना एम. एस. सि. बी.(महावितरण) च्या हलगर्जी पणा मूळे जिव गमवावा लागला, असल्याचे समजते.
प्रहार संघटनेच्यावतीने प्रशासनाला
जाधव परिवाराला न्याय मिळवून देणार , अन्यथा आम्ही आत्महत्या करु, असा इशारा प्रहार युवा तालुका अध्यक्ष मंगेश साबळे यांनी दिला असून या वेळी
.पंकज पिंपळे सामाजिक कार्यकर्ते
श्री.रोहिदास डकले प्रहार तालुका प्रसिद्धी प्रमुख नारायण मिसाळ तालुका उपाध्यक्ष बदनापूर हे उपस्थित होते ते पुढे म्हणाले की
एम. एस. सि. बी.महावितरण च्या अधिकाऱ्याला विलंबित करावे व जाधव परिवार ला ३० लाखांची आर्थिक मदत करावी, अशी मागणी ही त्यावेळी केली.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा