तुळजापूर प्रतिनिधी /रुपेश डोलारे , उस्मानाबाद
(दि.२५)रोजी आले असता वंचित बहुजन आघाडी मध्यवर्ती कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत प्रकाश इंगळे,बालाजी शिंगे,प्रा चक्षुपाल कांबळे सह प्रमुख तसेच वंचितचे मिलींद रोकडे,जीवन कदम उपस्थीत होते.प्रथम प्रस्तावने मध्ये मिलींद रोकडे यानीं उमेदवार तसेच उपस्थीत पदाधिकारी यांचा परिचय करुन देत बहुजन कर्मचारी, विध्यार्थी आघाडी व विविध विंग,सामाजिक संघटनेचा प्रा.नागोराव पांचाळ यानां पाटींबा असून सर्वानीं वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार यानाच मतदान करावे,असे आवाहन केले.त्यानंतर उमेदवार प्रा.नागोराव पांचाळ यानी निवडणूक जाहीरनामा वर वार्तालाप केला.यावेळी उमरगा विधानसभा लढविलेले रमाकांत गायकवाड, मिलींद रोकडे,सुरेश चौधरी,राकेश जेटीथोर,कंरण डावखरे इ.उपस्थीत होते.प्रा.पांचाळ पुढे बोलतानां म्हणाले की,चहा विकणारा प्रत्येक व्यक्ती पंतप्रधान होत असतील तर तितकेच देश निर्मिती करावी लागेल.शिक्षकांच्या प्रश्नावर पडदा पडलेला आहे.पुर्वी प्रतिनिधी गुत्तेदार असल्याने गुत्तेदारीचे कामाचा अनुभव अधिक आहे.ती काम झाली.मात्र प्राध्यापक, कंत्राटी कर्मचारी अंधारात असून त्यावर कोणीही बोलत नाही. मागण्या पुर्ततेसाठी अनेक अंदोलने झाली तरीही प्रश्न आहेतच.यापुढे अंदोलने करण्यापेक्षा मतपेटीतून लढा द्या असे सर्वेसर्वा अँड.बाळासाहेब आंबेडकर यानीं सल्ला दिल्याचे प्रतिपादन केले.ओबीसी मंत्रालयाची तत्कालीन सरकारने नुसती घोषणा केली प्रत्यक्षात काहीच नसल्याचे बोलून दाखवले.त्याचबरोबर उस्मानाबाद जिल्ह्यात पवणचक्की प्रकल्पाचा मूळ शेतकऱ्यावर अन्याय न होता फायदा करुन देण्यासाठी आम्ही पुर्वीपासून च काम करत आहेत, आम्ही राजकरण करत नाही तर चंळवळ करणारी माणसं असल्याने बहुजन पदवीधर मतदार यानीं मतदान करावे,अशी विनंती केली. मला निवडून दिल्यास कंत्राटी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करणार,भरती प्रक्रियेत ५ वर्ष नंतर एक्सटेंशन बंद करणार, एजेन्शी पध्दत बंद करणार, जुनी पेन्शन साठी लढा देणार,DCPS / NPS हा घोळ मिटविणार,३३ वर्ष सेवा ६० वय यातून प्राथमिक शिक्षकांना सूट मिळवून देणार,शाळा न्याय प्राधिकरण,सशक्तीकरण करणार,न्यायाधीशांची नेमणूक स्वतंत्रपणे करणार,पदवीधर यानां उध्योग प्रशिक्षण व निधी उपलब्ध करुन देन्यासाठी लढणार,उच्च शिक्षणात शिक्षणात प्राथ./माध्य.शिक्षकांच्या मुलांसाठी फ्री शिप मिळवून देणार,मराठवाडा साहित्य व सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी आंदोलन करणार ह्या इतर कामं करणार असल्याचे सांगितले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलींद रोकडे तर आभारप्रदर्शन विकास बनसोडे यानी केले.यावेळी विविध संघटनेचे पदाधिकारी,कर्मचारी,कार्यकर्ते मोठ्या संखेने उपस्थित होते.
प्रतिनिधी रुपेश डोलारे तुळजापूर उस्मानाबाद
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा