किलज गावच्या शिरपेचात मानाचा तुरा
एकाच वेळी तीन युवक झाले सैन्यात भरती
सलगरा दि. - प्रतिनिधी / प्रतिक भोसले
तुळजापूर तालुक्यातील किलज येथील ३ तरूण आपल्या जिद्द आणि चिकाटी सोबतच कठीण परिश्रमाने भारतीय सैन्य दलात भरती झाले आहेत.
गावातील तरुणाईचा कल हा देशसेवेसाठी जास्त असल्याचे या मधून निदर्शनास येत आहे, किलज गावातील एकदाच तीन तरुणांच्या भरती होण्याने गावातील ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद दिसून येत आहे.
फेब्रुवारी महिन्यात झालेल्या सैन्य भरती मेळाव्यात किलज येथील तीन युवक शिवशंकर कुठार, हरिबा शिंदे, शंकर निर्मळे यांनी मैदानी चाचणी बरोबरच मेडिकल चाचणी मध्ये यश मिळवले होते. या तिघांच्या लेखी चाचणीचा निकाल आला असून, हे तिन्ही युवक भारतीय सैन्य दलातील भरतीसाठी पात्र ठरले आहेत. निवड झालेल्या तिन्ही युवकांचा तसेच किलज गावातील महेश कुठार यांचे भाच्चे अमोल जेवळे यांनी वैदकीय क्षेत्रात लागणाऱ्या एम.बी.बी. एस. या परीक्षेत चांगले गुण मिळवून शासकीय महाविद्यालयाचा विद्यार्थी म्हणून पात्र ठरला आहे. दि.२३ नोव्हेंबर रोजी किलज गावातील रहिवासी तसेच मुंबई मुख्यालय येथील पोलीस उपनिरीक्षक या पदावर कार्यरत असलेले एन.जी. कुठार यांनी सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी गावातील ज्ञानेश्वर कुठार,किलज गावचे पोलीस पाटील तानाजी मरडे, गावचे चेअरमन पंडित जळकोटे, गावातील अभिनेता प्रविण कुठार, गुंडू मुळे, महेश कुठार, गणेश कुठार सह आदी ग्रामस्थ आणि युवक वर्ग उपस्थित होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा